धाराशिव
केशेगाव (ता. धाराशिव) येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते लहु रामा खंडागळे यांनी धाराशिव जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात लेखी तक्रार सादर करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की, महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना मोबाईलवरून नियमबाह्य पद्धतीने चौकशीसाठी बोलावण्यात आले, तसे पत्र पोलिस प्रशासनाने त्यांच्या व्हॉट्स ॲप वरती पाठवले.ज्यामुळे त्यांचा मानसिक छळ झाला.
खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, दिनांक १७ मार्च २०२३ रोजी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक रिपोर्ट पाठवणे गरजेचे होते, मात्र तो मुद्दाम टाळण्यात आला. त्या संदर्भात त्यांनी तक्रार केली आहे. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने
लहू खंडागळे यांना अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून, यामागे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आणि चौकशीतील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“जर मोबाईलवरून नोटीस देणे कायदेशीर मानले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनीही मोबाईलवरूनच तक्रारी देणे आणि पोलीसांकडून स्वीकारणे ही प्रक्रिया रूढ करावी,” अशी ठाम भूमिका खंडागळे यांनी मांडली आहे.
या प्रकरणातील दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र, संभाजीनगर आणि,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे केली आहे.
- विठ्ठल दर्शनासोबत आधुनिक शेतीचे पंढरीत दर्शन (श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाचा जय्यत तयारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन)
- पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
