कळंब (जि. धाराशिव) : कळंब शहरातील मयुर साडी सेंटर येथे दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय 39, रा. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (रा. लातूर) यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.15 वा. ते 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वा. या कालावधीत बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशा धमक्या आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दुकानाच्या शटरवर पोस्टर लावून “दुकान उघडले तर सोडणार नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू” अशीही धमकी दिली गेली.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2), 189(2), 191(2), 190(2), 329(3), 351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
