Home Blog Page 77

दैनिक जनमत २४ जुलै २०२३ E paper

 

विद्यार्थ्यांनो सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका – सपोनि सिद्धेश्वर गोरे

 

सलगरा,दि.२२(प्रतिनिधी)

‘तुम्ही सोशल मीडियाचा की, सोशल मीडिया तुमचा’ वापर करून घेतय हे पण बघण तितकच महत्वाचं आहे. शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे नावलौकिक करावे. शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करावी. होता होईल तितका सोशल मीडियाचा वापर कमी करावा. सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्यावरील ताण कमी करण्यासाठी करावा, तो वाढवण्यासाठी नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनो! ‘तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका’ असे प्रतिपादन बोलताना नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले.

तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील सतिश पवार आणि खानापूर येथील विश्वजित गायकवाड या दोघांची २०२० च्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सलगरा (दि.) येथील कै.अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयात (दि.२०जुलै) रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबुमाता आणि संतराम लोमटे या दोन्ही महाविद्यालयांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि ‘सोशल मीडिया संदर्भात मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. मात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यूपीएससी – एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, या परीक्षांचं स्वरुप कसं असतं, वयोमर्यादा काय असते, अभ्यासाचं नियोजन कसं असाव, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. यांसारख्या विषयांवर कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सतीश पवार आणि विश्वजित गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

सर्व सकारात्मक गोष्टी जरी सोशल मीडियाद्वारे घडून येत असल्या तरी याची एक दुसरी बाजू पाहायला मिळते. ती म्हणजे या सर्व गोष्टींचा भडीमार एकाच वेळी एका अभ्यास विषयासाठी उपलब्ध असणार्‍या विविध वेबसाईट्स, ऑनलाईन लेक्चर सोबतचे हजारो लेख, व्हिडिओ यामध्ये अभ्यासकांची वेगवेगळी मते विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करतात. यामध्ये कोणते सत्य याचा संभ्रम निर्माण होतो. माहिती मिळते पण ज्ञान मिळते का..? पुस्तक डाऊनलोड करण्याची संख्या वाढत आहे, पण ते वाचलं जातं का..? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे. फक्त संग्रहासाठी आणि शेअर करण्यासाठी विविध शैक्षणिक अ‍ॅप्स मोबाईलमध्ये दिसत आहेत. हे नाकारून चालणार नाही, यामध्ये अलीकडे आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. ती म्हणजे स्मार्टफोनचा वापर करून, परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाबाहेर पाठवणे. त्याद्वारे कॉपी करणे. हे सर्व पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्या परीक्षार्थ्यावर गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर पुन्हा त्या विषयाचा पेपर घ्यावा लागतो. नवीन यंत्रणा राबवावी लागते. जे विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. स्मार्ट वापराबरोबरच त्याचा स्मार्ट दुरुपयोग करणारा वापरकर्ता दिसत आहे. यालासुद्धा आळा बसला पाहिजे. शाळेपासून मुलांना मोबाईलद्वारे शिक्षण दिलं गेलं तर त्याच्या अतिवापरामुळे मानसिक ताणतणाव वाढून आरोग्य धोक्यात येऊ शकतं. याचा परिणाम घातक आहे. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. शेवटी कोणत्याही गोष्टींचा अतिवापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईटच असतो, असे मत बोलताना काही जणांनी व्यक्त केले. 

या वेळी सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, उत्तमराव लोमटे, पोलीस नाईक एस.आर.सगर, ग्रा.पं. सदस्य जीवन लोमटे, प्राचार्य ज्ञानेश्वर लोमटे, प्रा.प्रताप मोरे, प्रा.किरण लोमटे, प्रा.अनिल लोमटे, प्रा.बालाजी फुलमाळी, प्रा.फयाज पटेल, प्रा.महादेव लोमटे, प्रा.सिताराम चव्हाण, प्रा.सुरेश सोमवंशी, प्रा.मारूती सुर्यवंशी, प्रा.विक्रम कांबळे, प्रा.महेश ढेकणे, जि.प.शाळेचे शिक्षक सुरेश वाघमोडे, अजित लोमटे, राहुल काटवटे, सुनील अंदगावकर, सागर मुळे, तात्या केदार, राहुल बोधणे आणि रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

दैनिक जनमत २२ जुलै २०२३ E paper

 

कासार समाजातील अल्पवयीन मुलीचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी

धाराशिव दि. १७ (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची एका नराधमाने छेडछाड करून तिचा नाहक बळी घेतला आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तर विशेष सरकारी वकील नेमून तो खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. तसेच त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री सोमवंशी क्षत्रिय कासार समाज उन्नती मंडळाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी या मार्फत उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा  येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हा खटला विशेष सरकारी वकिल नेमून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. तसेच त्या मुलीचा गावातीलच एका गावगुंडाने मागील वर्षभरात अनेक वेळा छेडछाड करून दि.१२ जून रोजी नाहक बळी घेतला आहे.  मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास कासार समाज जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला आहे. या निवेदनावर अखिल भारतीय मध्यवर्ती मंडळाचे संचालक अरुण यादगिरे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, युवक जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, वैभव विभुते, शिरीष झरकर, वैभव कासार, चैतन मैंदर्गे, सतीश सातपुते, सावन देवगिरे, शार्दुल कासार, संतोष कपाळे, अमित जगधने, अजय शीलवंत, सुजित झरकर, एन.बी. झरकर, एस.एस. देवगिरे, प्रविण गडदे, सचिन झरकर, काकासाहेब कासार, सुधाकर शेट्टे, शिवम देवगिरे, मनोजचंद गडदे, शिवाजी कोळपे, सुरज देवगिरे, नितीन कोळपे, आदित्य जगधने, किरण कंदले आदींच्या सह्या आहेत.


शिवरायांचा अपमान कसबे तडवळे कडकडीत बंद! गावात तणावपूर्ण शांतता

 

सुरेश पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करणार का? 

     धाराशिव:- हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अजित पवार गट सुरेश पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याने कसबे तडवळे गाव कडकडीत बंद करण्यात आले.   

               राष्ट्रवादीतील एक गट फुटून सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी धाराशिव येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करून कार्यकर्त्यांना शरद पवार साहेब यांच्या सोबत राहण्यासाठी सद्बुद्धी देवो असे शिवरायांकडे साकडे घातले होते. याला उत्तर देताना प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने. शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. याचा निषेध करण्यासाठी आज दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गावातील शिवप्रेमींनी गाव बंद आंदोलन केले होते. यावेळी शिवप्रेमीचे आंदोलन हाणुन पाडण्यासाठी सुरेश पाटील यांनी देखील गावामध्ये रॅली काढली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही  तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले असले तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तत्पूर्वी काही नागरिकांनी सर्वांसमोर माफी मागण्यास सांगितली मात्र मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे आज माफी मागणार नाही अशी भूमिका सुरेश पाटील यांनी घेतली होती.

पक्षातून हकालपट्टीची मागणी

 सुरेश पाटील यांच्या वक्तव्याचा विरोध सगळीकडेच होत असून त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. काहींनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली असून पक्ष काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.

बोगस ठराव प्रकरणी लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचासह एक सदस्य अपात्र

 ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा महत्वपूर्ण निर्णय


लोणी ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का तालुक्यात खळबळ

परंडा (भजनदास गुडे ) पदाचा दुरुपयोग करून शेत रस्त्याचा बोगस ठराव तहसिल कार्यालयात दाखल केल्या प्रकरणी परंडा तालूक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच,उप सरपंचा सह एका सदस्याला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी अपात्र ठरवील्याने लोणी सह तालूक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

          लोणी येथिल तक्रारदार विठ्ठल सर्जेराव शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्या मार्फत विभागीय आयुक्त यांच्या निर्णया विरूद्ध ग्रामविकास मंत्री गीरीष महाजन यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते.

       या बाबत सवीस्तर वृत्त असे की विठ्ठल शिंदे यांनी लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी शिंदे,उपसरपंच विनोद शिंदे व ग्रामपंचायत सदस्या प्रियंका माळी यांच्या विरूध्द ऐनापूर वाडी शिवारातील गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामसेवक यांच्या परस्पर बोगस ठराव जोडून तहसिल कार्यालयात दाखल केल्याने  त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी अशी लेखी तक्रार शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे दाखल केली होती.

             या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही साठी सदर प्रकरण विभागीय आयूक्त यांच्या कडे सुनावणी साठी दाखल करण्यात आले होते.मात्र दि ८ फेबुवारी २०२३ रोजी तक्रादार विठ्ठल शिंदे यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात आला होता. विभागीय आयूक्त यांच्या निर्णया विरूद्ध तक्रारदार विठ्ठल शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे दि १७ जानेवारी २०२३ रोजी अपील दाखल केले होते.दि २१ जून २०२३ रोजी सदरील प्रकरणाची मुंबई येथून व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेण्यात आली. 

            या सुनावणी मध्ये ऐनापूरवाडी येथील जमीन गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून  शेतरस्ता करण्याच्या ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला नसल्याचे पत्र ग्रामसेवक यांनी दि २८ मार्च २०२२ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांना दिले होते.

             याच मुद्दावर ॲड. विजयकुमार शिंदे यांनी यूक्तीवाद करून अर्जदाराची बाजू मांडली सर्व कागद पत्राची पडताळणी करून ग्रामविकास मंत्री गीरीष महाजन यांनी विभागीय आयूक्त यांचे आदेश रद्द करून विठ्ठल शिंदे यांचे अपील मंजूर केले आहे.

       सरपंच श्रीमती राणी शहाजी शिंदे यांना सरपंच व सदस्य पदावरून तर उप सरपंच विनोद पांडूरंग शिंदे यांना उपसरपंच पदावरून व सदस्य पदावरून तर  ग्रा.प सदस्या श्रीमती प्रियंका माळी यांना सदस्य पदावरून काढून टाकन्यात येत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिला आहे.

           एकाच वेळी सरपंच,उप सरपंच पदासह सदस्यत्व व एकाचे सदस्य रद्द होऊन आपात्र होण्याची तालूक्यातील पहिलीच घटणा असल्याने तालूक्यात खळबळ उडाली आहे.