शासकीय वहानांचा खाजगी कामासाठी वापर वाढला… करदात्या जनतेमध्ये नाराजी..
उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरात शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आपल्या सरकारी वाहनांचा वापर खाजगी व घरगुती कामाकरीता करीत असल्याने करदात्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
शहरात असलेले डी मार्ट अनेक सर्वच वस्तूंचे भव्य दालन आहे. हे मुख्य शहराच्या बाहेर असल्याने व वर्दळ नसल्याने शासकीय अधिकारी त्यांच्याकडे असणारे वाहन इकडे येण्यासाठी सहज वापरतात.
दिनांक १ डिसेंबर रोजी पोलीस विभागातील दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे वज्र हे वाहन डिपार्टमेंट मधील एका अधिकाऱ्याची सामानाची खरेदी करण्यासाठी डी मार्ट येथे आणले गेले होते. वज्र नावाच्या गाडीचा वापर वरिष्ठांच्या डोळ्या आड करून वरिष्ठांचा घात करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
शासकीय वाहनाचा खाजगी कामासाठी होणारा वापर नवीन नाही मात्र हे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढत चालले आहे. शासकीय खर्च जनतेच्या करातून होतो हे सर्वश्रुत आहे. त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा असते. शासकीय वाहनाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
मात्र हे वाहन नियमित तपासणीसाठी डी मार्ट परिसरात गेले असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा परिचय
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा श्री. ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.
२७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले श्री. उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या श्री. ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
राजकीय कारकीर्द
श्री. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे 2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.
व्यक्तीगत जीवन
श्री. उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. श्री. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
कलात्मक पैलू
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
योगदान
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.
मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
२००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने श्री. उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
श्री. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या श्री. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व श्री. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.
44 लाखांचा गांजा ग्रामीण पोलिसांनी केला नष्ट ;न्यायालयाच्या निकालानंतर ची कारवाई
सोलापूर – (अकबर बागवान) सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रातील विविध अकरा गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तब्बल 880 किलो वजनाचा 44 लाख रुपये किमतीचा गांजा न्यायालयीन निकालानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नष्ट केला आहे.
बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील मे कीर्ती ॲग्रोटेक लिमिटेड या कंपनीत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ म्हणून ओळखला जाणारा गांजा जप्त केला होता.
. याप्रकरणी न्यायालयात गुन्हे दाखल झाले होते न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सदरचा जप्त करण्यात आलेला 880 किलो इतक्या वजनाचा गांजा त्याची अंदाजे किंमत 43 लाख 95 हजार इतका कंपनीत जाळू नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. . सदरची प्रक्रिया पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत यांच्या देखरेखीखाली लघु न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे डॉक्टर संदीप शेट्टी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी भोसले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक हर्षवर्धन शिंदे प्रभारी महसूल नायब तहसीलदार बुक वाले, तसेच दोन पंचांच्या उपस्थित वजन करून गांजा नष्ट करण्यासाठी पाठवण्याची प्रक्रिया करण्यात आली. सदर प्रक्रिया पूर्ण करण्याकामी राखीव पोलीस निरीक्षक केबी काजळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, डीबी राठोड पोलीस हेडकॉन्स्टेबल आरडी निंबाळे, बांगर, केंद्रे ,जाधव व सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे










































































