सातत्याने पर्जन्यमानाचे कमी होत असलेले प्रमाण हे चिंताजनक बाब असून त्यामुळे पडत असलेल्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवण्यासाठी काम करावे असे मत आयकर विभाग औरंगाबाद चे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद यांच्या वतीने मारवाड गल्ली येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा , उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,आई गोशाळेचे अध्यक्ष सतीश सोमानी, अन्नपूर्णा ग्रुपचे अध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, पी. के. मुंडे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
नेमक्या समस्या समजून काम केल्यास उत्तर लवकर मिळते आणि काम करण्यास सोपे होते. वृक्ष लागवडी सोबत पर्यावरण जनजागृतीसाठी एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद करत असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरणाची काळजी आपण घेतली तर पर्यावरण पण आपली काळजी घेईल असेही मत यावेळी विश्वास मुंडेंनी व्यक्त केले.
जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपले उस्मानाबाद हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व सहभाग घ्यावा व यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पण सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी वृक्ष लागवड सोबत वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे असून जास्त प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास सध्याची दुष्काळी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणूस बदलू शकतो पण वृक्ष बदलत नाही त्यामुळे वृक्ष लागवडीचा आपणांस फायदाच असुन कोणत्याही प्रकारचे नुकसान आपले होत नाही असे ही मत यावेळी आर. राजा यांनी व्यक्त केले.
शासनापेक्षा वृक्ष लागवडी मध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वसामान्य नागरिकांने वृक्ष लागवड केल्यास त्या वृक्षाप्रती प्रेमाची भावना त्या व्यक्ती कडे असते त्यामुळे वृक्षसंवर्धन करण्यास मदत होते. वृक्ष लागवड जास्त प्रमाणात व्हावी या उद्देशाने या वर्षी उस्मानाबाद नगरपालिका मधून प्रत्येक व्यक्तीला दोन झाडे देण्यात येणार असून ज्यांना वृक्ष हवे आहेत त्यांनी नगरपालिकेमधून वृक्ष घ्यावेत असे आवाहनही यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
यावेळी आई गोशाळा चे अध्यक्ष सतीश सोमाणी यांना गोरक्षण व गोसंवर्धन साठी गोरत्न पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल अजमेरा व आभिलाष लोमटे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुणाल गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले
यावेळी जितेंद्र खंडेरिया,मनोज कोचेटा, विशाल थोरात, अमर चांडक, हरीश सारडा, रोहन चौहान, अमित अजमेरा, अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, अँड. विश्वजीत शिंदे, अभिमान हंगरगेकर,अनुप बांगड, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, किरण वारे पाटील, सचिन बारस्कर, सचिन बांगड,आदित्य लगदिवे, अक्षय गांधी, मुजाहिद सिद्दिकी, रोहित सहाने व अन्नपूर्णा ग्रुप,एकता फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
वृक्ष लागवडी सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण जनजागृतीचे काम करावे – सहआयुक्त विश्वास मुंडे
अग्रलेख – वृत्तपत्रांना फटका
वृत्तपत्रांना फटका
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात सामान्यांना म्हणावा तसा दिलासा नाही तसेच सामान्यांच्या जिवनात महत्वपूर्ण घटक असलेल्या वृत्तपत्रांनाही फटका बसणार आहे. वृत्तपत्रांच्या कागदावर 10 टक्के कस्टम ड्युटी लावली आहे. याचा परिणाम वृत्तपत्रांच्या कींमतीवर होईल याचा बोजा बोजा वाचक आणी वृत्तपत्रे दोघांवरही बसणार आहे. 2010 नंतर वर्तमानपत्रांच्या कागदावर ड्युटी नव्हती. वृत्तपत्र ही एक चळवळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीला बळकटी देत होती. तर स्वातंत्र्यानंतर समाजप्रबोधन करण्याचं काम वृत्तपत्रांकडे आहे. सोशल मेडीया आणी इलेक्ट्रॉनिक मेडीयांचा वापर वाढला असल्याने याचा परिणाम वृत्तपत्रांवर झाला. मात्र मुद्रीत माध्यमांच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता आजही कायम आहे. वृत्तपत्र चळवळ टिकवण्याची जबाबादारी शासनाची आहे सरकारला त्यांच्या चुका सुधारायच्या असतील तर वृत्तपत्र टीकलीच पाहीजेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुरूवात देखील वृत्तपत्रातून झाली. व्यंगचित्र आणी अग्रलेखांच्या माध्यमातून त्यांनी देशाला वेगळी दिशा दिली. आत्ताच्या काळात व्यंगचित्र आणी अग्रलेख सोशल मेडीयातून प्रसिद्ध करता येतात मात्र त्याला लोकांपर्यंत पोहचण्याला मर्यादा आहेत. फेसबुक जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी पोस्ट पोहोचवण्यासाठी पैसै घेते. भविष्यात सोशल मेडीया किंवा मोबाईल मुळे सायबर वाॅर सुरू झाल्यास समाजप्रबोधन करण्याचे कोणतेच माध्यम उरणार नाही तेव्हा वृत्तपत्रेच चांगली भूमिका वठवू शकतात. त्यासाठीच वृत्तपत्र चळवळ टिकली पाहीजे. मोठी वृत्तपत्रे अशी झटके सहन करू शकतात मात्र लघु व मध्यम वृत्तपत्रांची अवस्था वाईट आहे. वृत्तपत्रे ज्या कींमतीत विकतात त्यापेक्षा दुप्पट खर्च त्यांच्या छपाईसाठी होतो ही वस्तुस्थिती आहे. सरकार या सार्या गोष्टी जाणतेच ती टिकण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत
बचावात्मक खेकडा प्रवृत्ती
बचावात्मक खेकडा प्रवृत्ती
खेकडा प्रवृत्ती मानवी जिवनात विकासाला खिळ घालते हे सर्वांनी महिती असते मात्र खेकड्यांचा वापर एखाद्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी केला जाणे हे अजबच म्हणावे लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणे फुटले त्यात 18 जणांचा जिव गेला धरणफुटीचे दोषी अजून ठरायचेत यात दोषी ज्याने धरण बांधले तो असू शकतो आणि गावकर्यांनी तक्रार करूनही ज्यांनी योग्य दखल घेतली नाही असे अधिकारी होऊ शकतात. हे धरण शिवसेनेच्या आमदारांच्या काळात बांधले गेले. त्यांच्या संबंधातील व्यक्तीनीच हे धरण बांधले आहे. दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई व्हावी ही प्राथमिक भुमिका सर्वांचीच असते. मात्र सत्ताधाऱ्यांकडून हे धरण खेकड्यामुळे फुटलय असे तर्क लावण्यात येत आहेत. यातून संबंधित कंत्राटदारला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. धरण आघाडी सरकारच्या काळात बांधले गेलय याला ते जबाबादार कितपत यापेक्षा जे सध्या ज्यांचे सरकार आहे त्यांनी याबाबत काय केले हे महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यात असेच धरण फुटल्यानंतर ते उंदरामुळे फुटल्याचा कयास बांधला होता. महाराष्ट्राला जलक्रांतीची परंपर आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी बांधलेली धरणे कधी फुटली नाहीत त्यापैकी अनेक धरणे आजही सुस्थितीत आहेत. इंग्रजांनी बांधलेली पूल, इमारती आजही चांगल्या स्थितीत आहेत. लोकशाहीत अभाव आहे नियोजनाचा. कंत्राटदार पोसणे हा सत्ताधाऱ्यांचा धर्म बनला आहे त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे तर्क लावले जातात. कोंढव्यातील घटनेनंतर तात्काळ संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला मात्र या कंत्राटदाराचा सत्ताधाऱ्याशी संबंध असणे यामुळे गुन्हा दाखल न होणे यातच सगळे काही समजून घेता येईल. उच्चस्तरीय समीती चौकशी करेल मात्र सत्ताधाऱ्यांकडून कंत्राटदाराच्या बचवासाठी प्रयत्न केले जाणे हे दुर्दैव आहे. भारतात अनेक मोठ मोठी धरणे आहेत काही धरणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरही असतात. उंदीर आणी खेकड्यामुळे धरणे फुटत असतील तर त्यांच्यापासून धोका आहे असे म्हणने हास्यास्पद आहे. खेकडे जलसंस्कृतीतल एक घटक आहेत. पाय ओढण्याची वृत्ती खेकड्याची असते. धरण फुटणे याला जबाबदार प्रशासनातील अधिकारी आहेत ज्यांनी जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे अशा अधिकार्यांवर कारवाई व्हीवीच.
पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· क्रीडा महर्षी बाबुलाल झंवर क्रीडा संकुलाचे उद्घाटन
· सुरेश अंबादास गुजराथी व्यायाम शाळेचे उद्घाटन
· क्रीडाप्रेमींची झाली सोय
पुणे, दि. 4 : पुणे शहरात अनेक चांगल्या गोष्टी असून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बिबवेवाडी ओटा येथील प्रभाग क्रमांक 71 मधील क्रीडा महर्षी बाबुलाल प्रेमलाल झंवर क्रीडा संकुल व सुरेश अंबादास गुजराथी व्यायामशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेवक सुनिल कांबळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटी, पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नीशल आहे. येत्या काळात पुणे शहरात अनेक चांगले प्रकल्प आणून पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या परिसरातील क्रीडा प्रेमींची चांगली सोय झाली आहे. या सुविधेचा क्रीडा प्रेमी नागरीकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी काम करत असलेल्या नगरसेवकांचे काम चांगले आहे. या नगरसेवकांच्या माध्यमातून यापुढेही या परिसराचा विकास होत राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला परिसरातील क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्टेडियम वर जेष्ठ नागरिक कट्ट्यावर दोघांचे वाढदिवस थाटात…
जिल्हा क्रिडा संकुल येथील ‘जेष्ठ नागरीक कट्टा’ वर अंबादास दानवे व के..के. गाडे या दोन जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून अनेक जेष्ठ नागरीक व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त व्रक्षारोपन ही करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक प्रदिप मुंडे,अभय इंगळे,माणीक बनसोडे,बाबा मुजावर,अभिजीत काकडे,सनी पवार,दिनेश बंडगर, राजाभाऊ कारंडे,संदिप साळुंके,वैभव मोरे,सुजीत साळुंके,संदिप अंधारे,उल्हास कुलकर्णी,गणेश सुत्रावे यांचेसह दत्तात्रय चव्हान,बबन लोकरे,विठ्ठल शेळके,मोहसीन शेख,यासह मोठ्या संखेने नागरीक उपस्थीत होते.
संयोजक युवराज नळे यांनी सर्वांचे आभार मानले.
संयोजक युवराज नळे यांनी सर्वांचे आभार मानले.
तेर येथे पोलिस रेझीग डे दिनानिमित्त जनजागृती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उमानाबाद तालुकयातील तेर येथे ढोकी पोलिस ठाण्याच्या वतीने व तेरणा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने तेर येथे पोलीस रेझीग डे दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी या रॅलीचा शुभारंभ मुख्याधयापक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर मानभव, साहयक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम वाघ,पो कॉ सागळे एस के, सरपंच सुवर्णा माळी, पोलीस पाटील फातिमा मनियार, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ,बिट अंमलदार श्रीशल्य कटे, तंटामुक्त समितिचे अध्यक्ष मगेश फडं, जुनेद मोमीन, चेअरमन नवनाथ नाईकवाडी, बालाजी पांढरे, विलास रसाळ, ईरशाद मुलानी, रणधीर सलगर,मजीद मनियार, नंदकुमार खोत, रमेश लकापते, शरद सोनवणे, बिभीशन देटे, शारदा देशमुख, पाटील मॅडम, बनसोडे मॅडम, मजुषा माचवे, आदिसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभव यांनी पोलीस विभागाच्या कार्याची व शास्त्राविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा
लोहारा/प्रतिनिधी
कोपर्डी घटनेसह महिलावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे,अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरूपयोग टाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी,स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु कराव्या अशा विविध मागण्यांसाठी दि.4 जानेवारी 2017 रोजी लोहारा तालुका मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव,महिला,युवक,मुली हातात भगवे ध्वज घेवुन व काळ्या फीती लावुन,व हातात विविध मागण्यांचे फलक,व बँनर घेवुन सहभागी झाले होते. या मोर्च्यामुळे संपुर्ण शहर भगवामय व मोर्चामय दिसत होते.या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना घेवुन शहरातील बसस्थानकापासुन करण्यात आली.हा मुक मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने छञपती शिवाजी महाराज चौक,आंबेडकर चौक,आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला.या मोर्चास पाठींबा देत शहरातील मुस्लीम समाजाने आझाद चौक येथे व लोहारा तालुका केमिस्ट्री अँण्ड डृगीस्ट असोसिशन यांच्यावतीने शिवाजी चौक येथे पाण्याचे वाटप करण्यात आले.
हा मोर्चा तहसील कार्यलयावर पोहचल्यानंतर शकंरराव जावळे पाटील महाविध्यालयाच्या प्रांगणात मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले.हा परिसर समाजबांधवानी मोठ्या प्रमाणात भरला होता.यावेळी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन ज्ञुतुजा राखुंडे यांनी केले.यानंतर पुढील मागण्यांचे निवेदन नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावी मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार व अनन्वित छळ करुन तिला ठार मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.जागतिक स्तरावर बलात्कारासारख्या गुन्ह्याचा विचार केला तर या गुन्ह्यातील आरोपींना इस्लामीक राष्टृामध्ये आठ दिवसात सजा होते.इतर पाश्चात राष्टृामध्ये दोन ते तीन महिन्यात गुन्हेगारांना सजा होते.परंतु आपल्या देशात या भयंकर अपराधांची प्रकरणे अनेक वर्ष चालतात.तरी आपल्या देशाच्या कायध्यामध्ये बदल करुन या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना आपल्या देशामध्ये तीन ते चार महिण्यात सजा होण्याबाबत कायध्यात बदल करण्यात यावा,केंद्रीय सामाजिक न्यायमंञी गहलोत याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार महाराष्टृात अँटृासिटीच्या गुन्ह्यात 8 व्या क्रंमाकावर आहे.100 अँटृासिटी गुन्ह्यापैकी 92.4% गुन्हे हे बोगस असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.तसेच देशभरामध्ये 92 ते 96% गुन्हे बोगस असल्याचे समितीने सांगीतले आहे.तरी अँटृासिटीच्या कायध्याचा गैरवापर होऊ नये म्हणुन त्यात आवश्यक ते बदल करुन नविन तरतुदी कराव्यात,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे, लोहारा शहरातील शिवाजी चौकात शिवछञपतींच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबीची पुर्तता करुन शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याची उभारणी करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन निकीता हंडीभाग,सत्यभागा जाधव,बबीता शिंदे,रेणुका चिंचोळ्,प्रतिक्षा मोरे,या मुलीनी प्रभारी तहसीलदार डॉ.रोहन काळे यांना दिले आहे.या मोर्चाची सांगता राष्टगीताने करण्यात आली.या मोर्चात तालुक्यातील मराठा समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,वकील मंडळी,महिला,नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी व प्रभारी पो.नि.फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हा मोर्चा लोहारा शहरात प्रथमच न भुतो न भविष्यतो असा निघाला होता.या मोर्चात अलोट गर्दि उसळली होती.या मोर्चात अतिशय शिस्तता दिसुन आली. यावेळी निर्माण झालेला कचरा शेवटी संवयसेवकांनी व मराठा समाजाने काढुन शहराची स्वच्छता केली.
कोपर्डी घटनेसह महिलावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे,अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरूपयोग टाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी,स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु कराव्या अशा विविध मागण्यांसाठी दि.4 जानेवारी 2017 रोजी लोहारा तालुका मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव,महिला,युवक,मुली हातात भगवे ध्वज घेवुन व काळ्या फीती लावुन,व हातात विविध मागण्यांचे फलक,व बँनर घेवुन सहभागी झाले होते. या मोर्च्यामुळे संपुर्ण शहर भगवामय व मोर्चामय दिसत होते.या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना घेवुन शहरातील बसस्थानकापासुन करण्यात आली.हा मुक मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने छञपती शिवाजी महाराज चौक,आंबेडकर चौक,आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला.या मोर्चास पाठींबा देत शहरातील मुस्लीम समाजाने आझाद चौक येथे व लोहारा तालुका केमिस्ट्री अँण्ड डृगीस्ट असोसिशन यांच्यावतीने शिवाजी चौक येथे पाण्याचे वाटप करण्यात आले.
हा मोर्चा तहसील कार्यलयावर पोहचल्यानंतर शकंरराव जावळे पाटील महाविध्यालयाच्या प्रांगणात मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले.हा परिसर समाजबांधवानी मोठ्या प्रमाणात भरला होता.यावेळी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन ज्ञुतुजा राखुंडे यांनी केले.यानंतर पुढील मागण्यांचे निवेदन नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावी मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार व अनन्वित छळ करुन तिला ठार मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.जागतिक स्तरावर बलात्कारासारख्या गुन्ह्याचा विचार केला तर या गुन्ह्यातील आरोपींना इस्लामीक राष्टृामध्ये आठ दिवसात सजा होते.इतर पाश्चात राष्टृामध्ये दोन ते तीन महिन्यात गुन्हेगारांना सजा होते.परंतु आपल्या देशात या भयंकर अपराधांची प्रकरणे अनेक वर्ष चालतात.तरी आपल्या देशाच्या कायध्यामध्ये बदल करुन या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना आपल्या देशामध्ये तीन ते चार महिण्यात सजा होण्याबाबत कायध्यात बदल करण्यात यावा,केंद्रीय सामाजिक न्यायमंञी गहलोत याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार महाराष्टृात अँटृासिटीच्या गुन्ह्यात 8 व्या क्रंमाकावर आहे.100 अँटृासिटी गुन्ह्यापैकी 92.4% गुन्हे हे बोगस असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.तसेच देशभरामध्ये 92 ते 96% गुन्हे बोगस असल्याचे समितीने सांगीतले आहे.तरी अँटृासिटीच्या कायध्याचा गैरवापर होऊ नये म्हणुन त्यात आवश्यक ते बदल करुन नविन तरतुदी कराव्यात,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे, लोहारा शहरातील शिवाजी चौकात शिवछञपतींच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबीची पुर्तता करुन शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याची उभारणी करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन निकीता हंडीभाग,सत्यभागा जाधव,बबीता शिंदे,रेणुका चिंचोळ्,प्रतिक्षा मोरे,या मुलीनी प्रभारी तहसीलदार डॉ.रोहन काळे यांना दिले आहे.या मोर्चाची सांगता राष्टगीताने करण्यात आली.या मोर्चात तालुक्यातील मराठा समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,वकील मंडळी,महिला,नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी व प्रभारी पो.नि.फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हा मोर्चा लोहारा शहरात प्रथमच न भुतो न भविष्यतो असा निघाला होता.या मोर्चात अलोट गर्दि उसळली होती.या मोर्चात अतिशय शिस्तता दिसुन आली. यावेळी निर्माण झालेला कचरा शेवटी संवयसेवकांनी व मराठा समाजाने काढुन शहराची स्वच्छता केली.
तेर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे अयोजन
> प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच धार्मिक क्षेत्रातही सर्व दूर परिचीत असलेल्या वारकरी संप्रदायातील थोर सत श्री सत गोरोबा काका याच्या पदपरशाने पावन झालेल्या तेर ता उस्मानाबाद येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री गाथा पारायण व संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी अयोजन करण्यात आले आहे या सप्ताह सोहळया निमित्त रोज काकडा भजन, विष्णू सशस्त्रनाम, गाथा पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरी कीर्तन, हरीजागराचा, या दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत तसेच या सप्ताह सोहळ्यात भागवतचार्य व विनोदचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर याच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथेसह रोज राज्य भरातील नामवंत कीर्तनकारची कीर्तनसेवा सपन होणार आहे या मध्ये बुधवार दिनांक 18 रोजी ह भ प श्री अच्युत महाराज दस्तापुरकर, गुरुवार दिनांक ह भ प श्री विठ्ठल महाराज दिवेगावकर, शुक्रवार दिनांक 20 रोजी ह भ प श्री गोविंद महाराज गोरे, शनिवारी दिनांक 21 रोजी ह भ प श्री महामंडलेशवर डॉ अमृतदास महाराज जोशी, रविवार दिनांक 22 रोजी ह भ प श्री रोहिदास महाराज हाडे, सोमवार दिनांक 23 रोजी ह भ प श्री महादेव महाराज राऊत, मंगळवार दिनांक 24 रोजी ह भ प श्री पुंडलीक महाराज जगले शास्त्री याची कीर्तनसेवा सपन होणार आहे तर बुधवार दिनांक 25 रोजी भागवतचार्य विनोदचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर याचे काल्याचे कीर्तन सकाळी 11 ते 1 या वेळेत संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी या सप्ताह सोहळयाचा तेरसह पचक्रोशीतील भावीकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत फडं, भास्कर माळी, बालाजी पांढरे, सुधाकर बुकन, महादेव खटावकर, भगीरथ तापडे, सतिश थोडसरे, तानाजी आधळे, दत्ता मगर, बालाजी नाईकवाडी, तानाजी आधळे, याच्या वतिने करण्यात आले आहे
कृतिशील संवंयअध्ययन साहित्यास प्रथम क्रमांक
लोहारा/प्रतिनिधी
कळंब येथील विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या जिल्हास्तरीय प्रदर्शनात लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जि.प.शाळेचे शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक गटातुन कृतिशील संवंयअध्ययन साहित्यास प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आ.विक्रम काळे होते.यावेळी ओदुंबर उकीरडे शिक्षणाधिकारी माध्यमिक,नलावडे उपशिक्षणाधिकारी,जोशी उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांना हा पुरस्कार देण्यात आला.42व्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांच्या साहित्याची निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे गटशिक्षणाधीकारी कमलाकर धुरगुडे(लोहारा),विस्तार अधिकारी बी.के.यरमुनवाड,केंद्र प्रमुख आर.एन.गरड,मुख्याध्यापक एम.आर.गवळी यांनी अभिनंदन केले आहे.
कळंब येथील विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या जिल्हास्तरीय प्रदर्शनात लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जि.प.शाळेचे शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक गटातुन कृतिशील संवंयअध्ययन साहित्यास प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आ.विक्रम काळे होते.यावेळी ओदुंबर उकीरडे शिक्षणाधिकारी माध्यमिक,नलावडे उपशिक्षणाधिकारी,जोशी उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांना हा पुरस्कार देण्यात आला.42व्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांच्या साहित्याची निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे गटशिक्षणाधीकारी कमलाकर धुरगुडे(लोहारा),विस्तार अधिकारी बी.के.यरमुनवाड,केंद्र प्रमुख आर.एन.गरड,मुख्याध्यापक एम.आर.गवळी यांनी अभिनंदन केले आहे.