Home Blog Page 243

दैनिक जनमत ०८ एप्रिल E paper

 

तासगावात पावणे तिन लाखाचा गुटखा जप्त, तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी

नूतन पोलीस निरीक्षक संजिवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई

तासगाव प्रतिनिधी/(स्पेशल क्राईम न्यूज)

आज रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान गोपनीय बातमीदारा मार्फत एक इसम त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू  वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे  सापळा रचून बस स्टँड परिसरात इसम नाव विशाल हणमंत विभूते वय ३३ वर्षे राहणार विटा यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड , व्ही १ सेंटेड टोबॅको असा एकूण २,७१,२००  रु चा माल व वाहन क्रमांक एम.एच. १० सी. आर. ३५७५, वाहन किंमत ३,००००० रु असा एकूण ५.७१,२००  रु चा माल हस्तगत केला 

     सदर मालाची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन विभाग मार्फत करून अन्न सुरक्षा अधिकारी चनवीर राजशेखर स्वामी वय ३१ वर्षे यांचे फिर्यादीवरून भा द वि कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्न सुरक्षा कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.तासगाव पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी आपला चार्ज घेऊन आठ दिवस झाले असून तासगाव पोलीस स्टेशनची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱी व कर्मचारी अवैद्य धंदा करणार्‍यावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार सह. पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक दराडे पोलीस उपनिरीक्षक शेळके, उपनिरीक्षक साळुंके, मदने, इतर कर्मचाऱ्यांनी अवैद्य चालणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष दिले असून लवकरच खुलेआम मटका,रात्रीची वाळूचोरी व जुगार सर्वात महत्त्वाचे गांजा यावर कारवाई करण्याची  अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत.

दैनिक जनमत ०७ एप्रिल E paper

 

अत्यावश्यक सेवा वगळून व्यापारपेठ बंद करण्याचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचे आवाहन

 

नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचारी रस्त्यावर.

अचानक व्यापारपेठ बंद करण्याने व्यापारी वर्ग नाराज संतप्त प्रतिक्रिया

तासगाव प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वीकेण्डला लोक डाऊन करण्याचे आदेश दिले होते शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा वगळून लागवड करण्याचे आदेश दिले होते परंतु आज मंगळवारी सकाळी दहा वाजता तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व त्यांचा सर्व स्टाफ अचानक रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आव्हान करत होते.अचानक बंद करण्याचे सांगितल्यामुळे व्यापारी वर्ग मध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून नाराजी व्यक्त करीत व्यापारी वर्ग, छोटे उद्योग धंदे वाल्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत करताना दिसत आहेत.

आकडा संदर्भात शहरातील व्यापारी मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशासनाने योग्य ती सूचना देणे गरजेचे असल्याचे मोठे व्यापारी वर्ग व छोटे उद्योग धंदे व्यापारी बोलत आहेत.

यासंदर्भात तासगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यापारपेठ बंद करीत आहोत असे सांगितले आहे.

खरे वास्तविक दोन दिवसांसाठी लाॅकडाऊन असताना अचानक व्यापारपेठ बंद करण्याचे आव्हान करण्यात आले ने तासगाव शहरातील सर्व व्यापारी वर्गाने तासगाव नगरपालिका कडे धाव घेतली असून यासंदर्भात प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यासंदर्भात प्रशासन काय व्यापाऱ्यांना उत्तर देणार याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

तासगावात रंगपंचमी दिवशीच दोन तरुणांच्या टोळक्यातील वादातून एका तरुणाचा भोकसून खून


विटा नाका परिसरात घडली दुर्दैवी घटना भोसकून तरुण हल्लेखोर पसार

नूतन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांचे समोर मोठे आव्हान

तासगाव प्रतिनिधी

      तासगाव शहरातील विटा नाका येथे आज सायंकाळी एकाचा भोकसून अमानुषपणे खून करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेने विटा नाका परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या तिनं चार महिन्यांपासून दोन तरून टोळ्यांमध्ये वाद सुरू होता. या वादातून हे कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे: सदरच्या तरुणांच्या टोळक्यातील वाद व भांडणे मारामारी यासंदर्भात तासगाव पोलिसांनी तातडीने त्यावेळेला पावले उचलून संबंधित तरुणांना पोलिसी खाक्या दाखवला असता तर आजचा हा प्रकार घडला नसता असे म्हटले तर वावगे ठरू नये यासंदर्भात तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्ती ही दत्त माळ परिसर इंदिरानगर झोपडपट्टी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तासगाव शहरांमध्ये सध्या दररोज सांगली नाका परिसर विटा नाका परिसर येथे तरुणांच्या टोळक्यामध्ये वाद-विवाद व मारामारीच्या घटना सतत सुरू आहेत. दोन्ही परिसरामध्ये देशी दारूची दुकाने आहेत तसेच त्या परिसरामध्ये मटका खुलेआमपणे सुरू आहे. पोलिसांनी तातडीने या परिसरावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे. सर्वात महत्वाचे हाणामारीचे व अवैद्यधंद्याचे हॉटस्पॉट सांगली नाका परिसर आहे तरी पोलिस प्रशासनाचे या घटनेकडे दुर्लक्ष होत असून नूतन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपला पॉलिसी खाकी दाखवावा अशी अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत. आज रंग पंचमी च्या पार्श्वभूमीवर दिवसाढवळ्या खूनासारखी तासगाव शहरातील लोक वस्तीतील घटना ही पोलीस असा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची घटना मानली जाते आहे सदरचा खून हा अवैद्य व्यवसायातून झाला असल्याची दबक्या आवाजात तासगाव शहरातील नागरिकांच्या मते चर्चा सुरू आहे. तरी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी तातडीने तासगाव शहरातील संपूर्ण अवैद्य धंदे त्यामध्ये खुले खुले आम मटका,जुगार, खुलेआम रात्रीचे होणारी वाळू चोरी इत्यादी घटनांमुळे तासगाव शहरांमध्ये टोळ्या झालेले आहेत. त्यामुळे सततच्या हाणामारी दादागिरी वादविवादाच्या घटना घडत असून.तातडीने सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी तासगाल शहरातील नागरिकांच्या कडून होत आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून तासगाव पोलिस प्रशासनाचे या सर्वांकडे दुर्लक्ष झाले असून नूतन अधिकाऱ्याने यावर तातडीने कारवाई करून पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा सुधारण्याचे  मोठे आवाहन तासगाव नूतन पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर आहे. दैनिक जनमत च्या २५ मार्च च्या अंकात नूतन पोलीस अधिकारी हजर होणार आहेत या बातमीच्या त्या संदर्भात तासगाव शहरात तरुणांच्या टोळक्याने चे वाद-विवाद व हाणामारीचे प्रकार सतत घडत असतात ही माहिती सदर अकांत दिली होती हे विशेष होय. तासगाव शहर व तालुका संवेदनशील तालुका असून लवकरच येत्या सहा महिन्यांमध्ये तासगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असून महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीचे पावले उचलून पुढील घटना व अनर्थ टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना उदगावात अभिवादन

शिक्षण संकुलाचा वटवृक्ष बनवण्याचा निर्धार

जयसिंगपूर – प्रतिनिधी  

शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन तथा उदगाव येथील  उदगाव एज्युकेशन सोसायटी संचलित  डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा रे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलचे संस्थापक चेअरमन स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आज सकाळी उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या प्रांगणात हे पुण्यस्मरण झाले. स्व. आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी अभिवादन केले. स्व. पाटील यांनी उदगाव येथे रोपण केलेल्या या शिक्षणसंकुलाचे वटवृक्षात रुपांतर करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

यावेळी शाळा समितीचे चेअरमन बाळासाहेब कोळी व संचालक सुरगोंडा पाटील, रमेश पाटील, यशवंत माने, पांडुरंग चंदुरे, आक्काताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या अभिवादन सभेचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एस. जंगम यांनी केले. सुत्र संचलन अध्यापिका ए. पी. खंजिरे यांनी केले. आभार पर्यवेक्षक आर. एम. मोरे यांनी मानले. यावेळी सर्व अध्यपक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विध्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.