Home Blog Page 230

दैनिक जनमत १० ऑगस्ट २०२१ E paper

शिक्षण सेवक सोसायटी लि.सांगली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा घ्या

 

महाराष्ट्र राज्य डी सी पी एस व एन पी एस संघर्ष समितीची मागणी

कुंडल (प्रतिनिधी).दिनांक 08/08/2021 रोजी शिक्षण सेवक सोसायटी ली. सांगली यांची ऑनलाईन यु ट्यूब द्वारे सर्वसाधारण सभा ठीक एक वाजता आयोजित करण्यात आली.

       या सभेत सोसायटीने साधारण एकूण 6000 सर्व सभासदांना  सात दिवस अगोदर निमंत्रण पत्रिका देण्यात आले होतेया सभेला नियमानुसार एकूण सभासद पैकी 600 सभासद उपस्थित असणे गरजेचे होते, पण त्यापैकी फक्त 302सभासद उपस्थित होते.कोरम पुर्ण झालेच नाहीच. आणि या सर्वसाधारण सभेत चेअरमन व संचालक यांनी,ऑनलाईन यू ट्यूब द्वारे आयत्या वेळेचे विषय,जादा खर्चाचा विषय, मागिल सभेचे विषय मांडले आणि कोणत्याच सभासदाचे म्हणणे न एकताच चेअरमन व संचालक यांनी  सर्व विषय पास करून घेतले,म्हणून सभेतील सर्व मंजुर विषय सभासदांच्या हितासाठी रद्द करावेत.

       त्यामुळें सांगली जिल्ह्यातील सर्व सभासदांनी व डी सी पी एस व एन पी एस  संघर्ष समितीचे खालील पदाधिकारी

जिल्हा कार्याध्यक्ष राजमाने सर,मनपा सचिव मकानदार सर,मनपा उपाध्यक्ष सूर्यवंशी सर,मनपा प्रमुख कलीम नदाफ सर,जिल्हा सदस्य मनोहर साबळे सर,जिल्हा उपाध्यक्ष राहूल जाधव सर,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रोहित सोळवंडे सर,जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे,तसेच जिल्हा सदस्य संबाळे सर,कोळी सर,सावंत सर,जिल्हा सचिव उमेश घोसरवाडे सर,जिल्हा महिला प्रमुख,गुरव मॅडम,मिरज तालुका अध्यक्ष राजीव पारधी सर, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण सर,महिला अध्यक्ष सुनिता शिंगाडे मॅडम, उपाध्यक्ष शिल्पा शिरद वाडे मॅडम,क. महांकाळ तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंजाळ सर,उपाध्यक्ष शरद कोळी सर, महिला उपाध्यक्ष स्मिता ओलेकर मॅडम,कार्याध्यक्ष अजित पाटील सर, सचिव शिवाजी कारंडे सर,प्रसिद्धी प्रमूख माणिक जाधव सर,तासगांव अध्यक्ष सूरज कुंभार सर,उपाध्यक्ष रामलाल कोकणी सर,पलूस अध्यक्ष राहूल मुंजा वर सर,उपाध्यक्ष समीर मुल्ला सर,जत अध्यक्ष विजय बुद्रुक सर, उपाध्यक्ष कोकणी सर,वाळवा अध्यक्ष भरत साळुंखे सर,शिराळा अध्यक्ष आसलम मुलाणी सर, उपाध्यक्ष दिपक पाटील सर, राज्य सहसचिव धनराज ठोंबरे सर इत्यादी सर्व पदाधिकऱ्यांनी हिष्कार टाकला आहे.

        त्यामुळे मा.चेअरमन व संचालक मंडळ यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्यात यावी व पुढची तारीख घोषित करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक जनमत ०९ ऑगस्ट २०२१ E paper

महापुरामध्ये जीव धोक्यात घालून विज चालू करणाऱ्यांचा शिवसेनेने केला सन्मान

गांधीनगर ( प्रतिनिधी )

पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी वीज वितरण कंपनीच्या उचगाव व गांधीनगर येथील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून विजपुरवठा चालू केल्याबद्दल करवीर शिवसेनेनेच्या वतीने सलाम ठोकून सन्मान केला.

वीज वितरणचे उचगाव येथील कर्मचारी किरण कोळी, विशाल ठाकूर व गांधीनगर येथील कर्मचारी नितीन कांबळे, अमित चौगुले,  अमित पवार, सुनील खटावकर, सुशील कांबळे या कर्मचाऱ्यांनी महापुराच्या पाण्यात उतरून विजेच्या पोलवर चढून अनुक्रमे उंचगाव व गांधीनगर येथील वीज पुरवठा पूर्ववत चालू केला. जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल तमाम जनतेच्या वतीने करवीर शिवसैनिकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.

  अशा धाडसी लोकसेवकांचा आदर्श सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले. उचगावचे शाखा अभियंता रघुनाथ लाड  व गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरणच्या या सहा कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही. 

यावेळी  युवासेनेचे विनायक जाधव, संतोष चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, महेश खांडेकर, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, विराग करी, महादेव चव्हाण, बाळासाहेब नलवडे,  सचिन नागटीळक व प्रफुल्ल घोरपडे, फेरीवाले संघटनेचे कैलास जाधव, दत्ता फराकटे, अजित चव्हाण, अजित पाटील, बंडा पाटील, दत्तात्रय विभुते, नितीन कांबळे यांनी उचगाव येथील वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

काटेगाव येथील पहिल्या आयएसओ अंगणवाडीची ३ वर्षातच दुरावस्था

 

काटेगाव (नितीन गाढवे)          

      बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील ISO अंगणवाडीच्या सिमेंट कांक्रीट छताचे प्लास्टर ढासळे आहे  व आतील बाजूस भिंतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत आतील बाजूस असणाऱ्या छताचे प्लास्टर फुगले आहे त्यामुळे ते छताचे प्लास्टर पावसाळ्यात कधीही कोसळू शकते,सुदैवाने लॉक डाऊन असल्यामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे होणारा अपघात टळला परंतु काटेगाव ग्रामस्ता कडून या अंगणवाडीत आपली मुले पाठवण्यास पूर्वीपासूनच विरोध आहे त्याचे कारण हि तसेच आहे या पूर्वी ची अंगणवाडी मारुती मंदिराजवळ होती ,आता जी नवीन अंगणवाडी बांधण्यात आली आहे ती म्हणजे नदीच्या वरच्या बाजूस आहे व  अंगणवाडी शेजारीच मोठी गटार आहे या गटारीतून पावसाळ्यात नदी नाल्या सारखे पाणी वाहते यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ISO अंगणवाडीच्या उद्घाटन समारंभाला तत्कालीन गटविकास अधिकारी गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता ,परंतु सध्या परिस्थिती पाहता मुलांकडे व अंगणवाडी कडे कोणाचे लक्ष्य आहे कि नाही असा सवाल पालक वर्ग विचारत आहे,या संदर्भात पालकांनी गटविकास अधिकारी यांना तक्रारी अर्ज करणार असल्याचे सांगितले. ज्यावेळेस छताचे प्लास्टर पडले होते या मध्ये मुलांची काही दुर्घटना झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार होते असा प्रश्न आता पालकवर्ग विचारत आहे.

      परंतु ३ वर्षा मध्येच अंगणवाडीची दुरवस्था होण्यास सुरुवात होणे म्हणजे कामात झालेला गहाळ पणा दर्शवित आहे,यावर वरिष्ठ अधिकारी आता काय कार्यवाही करणार याकडे सर्व काटेगाव ग्रामस्थाचे लक्ष्य लागले आहे.