Home Blog Page 228

महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेरायाची श्रावणी पूजा संपन्न

 

नळदुर्ग :- संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,मल्हार मार्तंड श्री खंडेरायाचे श्रावणी रविवार पूजा ,अणदूर चे पुजारी,सेवेकरी नंदकुमार ढेपे व महालदार शुभम मोकाशे यांनी २९ ऑगस्ट रोजी पूजा केली,संपूर्ण श्रावण महिन्यात खंडोबा ट्रस्ट ने शासनाचे सर्व नियम पाळून श्री ची धार्मिक विधी पूर्ण केले आहेत.नंदकुमार ढेपे आजचे सेवेकरी पुजारी यांनी स्वखर्चाने आजची पूजा केली,असून कोरोना नियमामामुळे,भक्ता विना देवाची ही परीक्षा या काळात होत आहे, देवाचे नित्य पूजा कर्म पुजारी मंडळी करीत आहेत ऐन श्रावणात सलग दुसऱ्या वर्षी ही पूजा होत आहे, श्रावण महिन्यात अणदूर खंडोबाला विविध पोशाखाने सजवण्यात येते तसेच राम राजू मोकाशे व शाम नीलकंठ मोकाशे यांच्या वतीने पहाटे ओल्या कपड्यात कावड घेऊन मैलापूर जवळील नागझरी मधून पाणी आणून देवाची पूजा पूर्ण श्रावण महिनाभर आणून त्याच पाण्याने पूजा केली जाते ती प्रथा आजही सुरू असून, कोरोना काळात मंदिर बंद असताना सुद्धा ही प्रथा परंपरा आजही चालू असून भक्त भाविक फक्त मुख्य दरवाजाचे दर्शन घेऊन समाधान पावत आहेत.या अशा भीषण संकटात मंदिरे सरकारने खुली करावीत जेणेकरून भक्त आपल्या देवाला भेटतील व हे संकट पळून जाईल अशी भावना सामान्य भक्तांनी व्यक्त केली आहेे.

“लग्न,कार्य झाल्यावर आपल्या कुलदैवताला येण्याची प्रथा ,परंपरा असून, आंध्र, कर्नाटक, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून भक्त भाविक आपले नवस फेडण्यासाठी येत असतात, त्यांना दरवाजाचे दर्शन घेऊन माघारी जावे लागते, नाविलाज आहे शासनाच्या नियम अटींचे पालन करून भक्ता ना ,भावनिक आव्हान केले जाते व सहकार्याची अपेक्षा करून सर्व धार्मिक विधी केले जातात.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट अणदूर

दैनिक जनमत २८ ऑगस्ट २०२१ E paper

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकून आंदोलन

 

उस्मानाबाद

 भाजीपाला आणि दुधाला भाव नसल्याने या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकत आंदोलन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात  म्हटले आहे की सर्व भाजीपाला पिकाचे व दुधाचे दर प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. बी बियाणे खते औषधे मजुरी याचा विचार केला तर शेतकऱ्याने जगायचे कसे?काही वर्षांपूर्वी कांद्याला किलोला अनुदान दिले होते त्याप्रमाणे सर्व भाजीपाला पिकांना किलोला 10 रुपये अनुदान, हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान द्या, कोरोनामुळे शेतकरी इतका वाईट अवस्थेत जगत आहे की त्यांच्या भावनेचा उद्रेक केव्हा होईल कोणती परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही यासाठी आपण ठोक उपाययोजना केल्या नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, मारुती दळवी, विष्णू काळे, उमेश चव्हाण नेताजी, जमदाडे, भोजने राजेंद्र ढोक, ओंकार कानडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

सावळजमध्ये स्वागत कमानीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात संपन्न

आ. सुमनताई पाटील व खा. संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती ;विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन

तासगांव  प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील सावळज येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या नियोजित नवीन स्वागत कमानीचा पायाभरणी शुभारंभ खा. संजयकाका पाटील व आ. सुमनताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पायाभरणी शुभारंभ करण्यात आला.सावळज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार व खासदारानी सावळज ग्रामस्थांना दिले.

यावेळी सरपंच स्वाती(ताई) पोळ, उपसरपंच संजय थोरात,जि.प. सदस्य सागर पाटील, जयवंत सदामते, ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, ऋषीकेश बिरणे, योगेश पाटील,विनोद कोळी,कल्पना बुधवले,अनिता भडके, रमेश कांबळे, कल्पना धेंडे, सुमन चव्हाण, संजय बुधवले, सोमनाथ कांबळे,माजी सरपंच हेमंत पाटील,मा. सरपंच नितिन तारळेकर, मा. सरपंच पांडुरंग भडके. माजी जि. प. सदस्य किशोर उनउने,व्हा. चेअरमन अनिल थोरात, पोलिस पाटील सुजाता बागवडे, दत्ता केडगे,अमोल पोळ,संदिप पाटील, नागेश सुतार, विजय चव्हाण,संजय पोळ,सागर थोरात , महादेव चिवटे, गणेश पाटील,रवींद्र शिंदे , गणेश चिवटे,अमोल लिगाडे,सचिन देसाई, ॲड. विजय धेंडे,ॲड. मिलिंद झेंडे , बाबा पाटील,शिदगौंड पाटील,प्रदीप फासे,जगु पाटील,अनिल शिंदे,जावी तांबोळी, नंदु देसाई,संजय सावळजकर,  बाबासाहेब पोळ,राजेंद्र पाटील, राजु कलाल यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सावळज गावातील श्री सिध्देश्वर मंदीरासमोर सुमारे ३५० वर्षापूर्वीपासून ऐतिहासिक दगडी कमान होती. ती जुनी झाल्यामुळे धोकादायक बनली होती. तेंव्हा ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी गटतट बाजुला ठेवून गावाचा ऐतिहासिक वारसा जपण्याकरिता नवीन कमान बांधण्याचे नियोजन केले आहे.

सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्याकडून कमानीची ऐतिहासिक डिझाईन बनविण्यात आली आहे. कुमार कलगुटकी यांच्या अनुभवी टीमकडे नवीन कमानीचे बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे. या भव्य स्वागत कमानीसाठी लोकवर्गणीतून निधी संकलीत केला जात आहे. अनेक दानशूर लोकानी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनी गावाच्या सौंदर्यात भर पडेल अशी दैदिप्यमान स्वागत कमान उभारण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, स्वागत कमानीच्या पायाभरणी शुभारंभच्या निमित्ताने गटतट बाजुला ठेवून सर्व ग्रामस्थांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरात लवकर ही ऐतिहासिक स्वागत कमान पुर्ण करण्यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहेत. या कामासाठी ग्रामस्थांनीही सढळ हाताने मदत करावी असे आवाहन स्वागत कमान ग्रामस्थ समितीने केले आहे.