Home Blog Page 210

पिक विमा भरलेल्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी या पध्दतीचा अवलंब करावा


उस्मानाबाद – जिल्हयात काही भागात अतिवृष्टी होत असुन पिक विमा भरलेल्या पिकाचे नुकसान विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन, ढगफुटी होऊन, पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्याने शेतकरी नुकसानीच्या सुचना देत आहेत. तसेच यापुढे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी यापुढेही पिक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासुन ७२ तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी व कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे.

प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. पिक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सुचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance किंवा विमा कंपनीचे Farmimitra हे अॅप डाऊनलोड करून त्या अॅपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००२०९५९५९ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी तसेच संबंधित गावचे कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने देखिल अर्ज करुन कळवु शकतात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

२५ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २५  सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार  कोविशील्ड लसीचा डोस


       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२ ऑक्टोबरची ग्रामसभा होणार ग्रामविकास विभागाचे परिपत्रक


उस्मानाबाद 

दरवर्षी दि. २ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते. तथापि, कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर सदर ग्रामसभा आयोजित करावी किंवा कसे याबाबत काही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी ग्रामिविकास विभागाकडे विचारणा केलेली आहे. यावर ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले असून सोशल डीस्टन्सिंग चे व कोविड १९ च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दि. २ ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन / ऑफलाईन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता

उस्मानाबाद – जिल्ह्यातील काही भागात वीज पडण्याची शक्यता आहे. त्या भागाचे लोकेशनचे छायाचित्र आम्ही दाखवत आहोत. वीज पडण्याची शक्यता आणि कालावधी पाहण्यासाठी दामिनी हे ॲप डाऊनलोड करा.विशेषतः शेतकऱ्यांनी शेतात सुरक्षित राहण्यासाठी या ॲप चा उपयोग करायला हरकत नाही.

वेळ रात्री ९.२४ 

वेळ ९.२७ 

वेळ ९.३० 

वेळ ९.३३

वेळ ९.४५ 

वेळ ९.४९

वेळ १०.१४

वेळ १०.४५

वेळ १०.४८

वेळ १०.५१

वेळ १०.५४

वेळ ११.०३ 

अपडेट द्यायचे थांबवत आहोत.. दामिनी ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमच्या लोकेशनच अपडेट मिळवू शकता. स्वतः आणि तुमच्याकडे पशुधन असेल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी न्या.

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकरी दिवेगावकर



उस्मानाबाद,दि.23(प्रतिनिधी):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण 72962 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 71290 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असून 70318 शेतकऱ्यांचे कर्जखात्यावर रक्कम 508 कोटी 98 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरीता आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.जिल्हयातील 1666 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे  बाकी आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र  किंवा संबंधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा.तसेच,आधार प्रमाणीकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास “रक्कम अमान्य” पर्याय उपयोगात आणण्यापुर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.

तेरणा धरण ‘ ओव्हरफ्लो ‘ सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने समाधान


 तेर (बापू नाईकवाडी) :-  उस्मानाबाद शहरांसह तेर ढोकी येडशी तडवळा कावळेवाडी आदी  गावाची तहान भागविणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.दिनांक 23 सप्टेंबर गुरूवार  रोजी सकाळी तेरणा धरण भरून वहात आहे.त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून धरणाच्या वरच्या बाजूला पडत असलेल्या दमदार पावसामुळे तेरणा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन दिनांक 23सप्टेंबर रोजी तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे 

१८ वर्षाच्या कालावधीत ६ वेळेस भरले धरण

विशेष म्हणजे सन २००३ ते २०२० या १८ वर्षांच्या कालावधीत तेरणा धरण यापूर्वी २००६ , २००८ , २०१० , २०१६ , २०१७ , साली पूर्ण क्षमतेने भरुन वाहिले आहे .योगायोग म्हणजे गतवर्षी २१ सप्टेंबर २०२० मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहिले होते यावर्षी २३ सप्टेंबर ला भरून वहात आहे.

ऊस लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ
गतवर्षी तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरण परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली होती सध्या हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येत्या काळात सुरू होणार असल्याने व तेरणा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात गतवर्षी पेक्षा यावर्षी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीवावर उदार होऊन तरुणांची स्टंटबाजी

धरण पुर्ण भरून वहात असल्याने पाणी  पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणावर गर्दी होत आहे त्यातच यातील अनेक हौशी तरुण जीवावर उदार होऊन फोटोसेशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे

धरणाची सध्य स्थिती 

धरणाची पाणी क्षमता      2113.50 द.ल.घ.मी.
उपयुक्त पाणी साठा.             20.554 द.ल.घ.मी
मृत     पाणीसाठा.                0.891 द.ल.घ.मी
पाण्याचा विसर्ग                            6 क्युसेक्स 
एकूण पाऊस                            ..602. मि.मी

२४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २४ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस


       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २  वाजेपर्यंत आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२१  रोजी सायंकाळी चार  वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  १०  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २४ सप्टेंबर  २०२१ रोजी  १० लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


   लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

खासदार साहेब आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला आहात : नितीन काळे

उस्मानाबाद –

खासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम करू नका कारण तुम्ही संसदेत सुद्धा फक्त आणि फक्त मोदींच्याच कृपेने पोहचला आहात हे लक्षात असू द्या. असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. खा. ओमराजे निंबाळकर यांनीमोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले असे प्रसिद्धीपत्रक काढले होते त्याला काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सोयाबीनचे दर शिकागोमध्ये सीबॉट (CBOT)येथे जागतिक स्तरावर ठरतात, याची कल्पना खासदारांना असेल अशी अपेक्षाही आम्ही करत नाही. मात्र ज्यांच्या नावावर आपण निवडून आलात, त्यांच्याबाबत विधान करताना त्या विषयाचा निदान थोडा तरी अभ्यास करायला हवा. एकूणच जागतिक स्तरावर सोयाबीनच्या दरामध्ये एकाएकी ऐतिहासिक घट झाली आहे. व आपण गुगल सर्च करण्याचे कष्ट घेतले तर ते लगेच बघायला मिळेल. कोविड महामारी मध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात करणे गरजेचे होते, सोयाबीन खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये ४२.५% वरून ३७.२५% घट करण्यात आली आहे. या आयात शुल्कातील बदलामुळे सोयाबीनच्या दरात घट झाली असं म्हणणं म्हणजे अज्ञानाचचं नाही तर हास्यास्पद आहे.

तसेच तुम्ही सोयाबीनचे भाव घसरले हा मुद्दा मांडलात हा एक मुद्दा आहे. मात्र केंद्र सरकारने सोयाबीनच्या आयात शुल्कात केवळ 5% कपात केली असता सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे ढासळू शकतात? याबाबत सविस्तर माहिती घेतली असता भावातील ही घसरण जागतिक बाजारपेठेतील चढ उतारावर अवलंबुन आहे.

मागील काही महिन्यात खाद्य तेलाच्या दरामध्ये जवळपास 80 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल या खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे. 

 ऐन सोयाबीनच्या हंगामामध्ये आज एवढा दर यापूर्वी कधीही नव्हता. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच आजवर मोदी सरकारने निर्णय घेतलेले आहेत. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा कृषिमंत्री असताना देखील सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला नाही. ऐन हंगामात तर ३००० सुद्धा कधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. मात्र आज ऐन हंगामात सोयाबीन सहा हजारा पेक्षा जास्त दराने विकले जात आहे. मोदी सरकारचा नेहमीच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहे व राहणार आहे.

ज्यांच्या मुळे आपण खासदार झालात, त्या व्यक्तीबाबत व त्यांच्या निर्णया बाबत बोलताना आपण थोडा तरी विचार करायला हवा मात्र अशी अपेक्षा करणं उस्मानाबाद करांनी सोडून दिलं आहे. 

शेतकऱ्यांना जोडून पंतप्रधानांना बदनाम करण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय काम केले याबाबत सर्व सामान्यानां माहिती द्यावी. अशी आमची मागणी आहे. असे काळे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते खा. ओमराजे निंबाळकर

मोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर  
  देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारनं 12 लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघात खासदार ओमराजे निंबाळकर यानी केला आहे.मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले आहे. 

सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.मागील पंधरा दिवसांपूर्वी 10 ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत.एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला असुन अगोदरच उत्पन्नात घट झाली आहे.एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा होत आहे.सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलेला घासच हिरावुन घेतल्याचे खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे.सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते, जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे.अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.