Home Blog Page 151

जातिनिहाय जनगणना एकदा करुनच टाका – उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई – जातिनिहाय जनगणना एकदा करुनच टाकायला हवी. ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांची नेमकी लोकसंख्या किती आहे? हे देशाला कळले पाहीजे. अनेक समाजांचे प्रतिनिधी आपल्या जातीसाठी आवाज उठवत असतात. पण त्यांच्याकडून स्वतःच्या जातीचा आकडा फुगवून सांगितला जातो. त्यामुळे जातिनिहाय जनगणना केल्यास हे सर्व मुद्दे निकाली निघू शकतात, अशी अपेक्षा  अजित यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ना. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही २९ हजार ६४७ कोटी रुपये होती. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशातील २१ वेगवेगळ्या राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले. त्यापैकी १४ हजार १४५ कोटी एवढी रक्कम राज्य सरकारला मिळाली. अद्याप आपल्याकडे १५ हजार ५०२ कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली. ज्यावेळी जीएसटी कायदा अस्तित्वात आला तेव्हा राज्य सरकारांनी ठराव करुन त्याला मान्यता दिली. २०१९-२० सालामधील महाराष्ट्राच्या वाट्याचे १ हजार २९ कोटी, २०२०-२१ मधील ६ हजार ४७० कोटी बाकी आहेत. २०२१-२२ मधील ८ हजार ३ कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम देखील लवकर मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील. याचा फायदा अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि विविध विकासकामांसाठी होईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर कमी करुन राज्य सरकारने साडे तीन हजार कोटी महसूल सोडून दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे अजित पवार म्हणाले. 

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार म्हणाले की, पत्रकारांनी राज्याचे जीएसटीचे किती पैसे बाकी आहेत, हे विचारल्यानंतर ते सांगणे रडगाणे असते का? वस्तूस्थिती लक्षात आणून देणे चूक आहे का? असा थेट सवाल अजितदादांनी उपस्थित केला. 

मागच्या दोन वर्षात संपूर्ण जग, देश आणि राज्यावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला खिळ बसली. त्यामुळे केंद्राला निधी देताना थोडा उशीर झाला. त्यावर आम्ही टीका टिप्पणी केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच कोरोनाच्या केसेस थोड्या वाढायला लागल्या आहेत. ही काळजीची बाब असून सर्वांनी पुन्हा मास्क वापरणे व इतर खबरदारी घ्यावी. राज्य सरकार, आरोग्य विभाग, टास्क फोर्स सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेनसारखे प्रोजेक्ट पूर्णत्वाला जायला हवेत. प्रकल्प अर्धवट राहिले तर प्रचंड नुकसान होते, त्याची कॉस्ट वाढते. सकारात्मक निर्णय घेतली गेले पाहीजेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. पण यातील अंतिम निर्णय मा. मुख्यमंत्री घेतील, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार असतील. तर काँग्रेसचेही दोन उमेदवार उभे करण्याचा विचार असल्याचे कळते. भाजपकडे चार उमेदवारांची मते असली तरी त्यांचा पाचवा उमेदवार उभा करण्याची मनस्थिती असल्याची ऐकीव माहिती मिळाल्याचे अजितदादांनी सांगितले.

माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीरात ४२५ पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार

उस्मानाबाद -डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.०१ जुन २०२२ रोजी, लोहटा (पश्चिम) ता. कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात लोहटा (पश्चिम) व परिसरातील सर्व वयोगटातील ४२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन संजय आडसूळ (सरपंच) यांच्या हस्ते झाले, उदघाटक अध्यक्ष विजेंद्र अण्णा चव्हाण (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद), अशोकभाऊ शिंदे (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद), व प्रमुख पाहुणे संभाजी जाधव, उत्रेश्वर पाटोळे, सतीश चव्हाण, बाबुराव खोसे, अमोल आडसूळ, रमेश खोसे, प्रतापरावजी आडसूळ, बाळासाहेब आडसूळ, त्रयंबक यादव, उध्दव यादव, दिपक आडसूळ, गोविंद सावंत, अनंत आडसूळ, बाळासाहेब खोसे, लक्ष्मण आगाशे, सुधीर आगाशे, पांडूरंग चव्हाण, नितीन आडसूळ, ग्रामसेवक धावारे सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले व मार्गदर्शन संजय आडसूळ (सरपंच) यांनी केले.

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सुरज पवार, डॉ. ईशान पटेल, डॉ.जय पटेल, डॉ. कृष्णा लाखे, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), नामदेव शेळके (कळंब तालुका जनसेवा केंद्र प्रमुख),  पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, अशोक मिसाळ, रवी शिंदे, नाना शिंदे, आशा कार्यकर्त्या ललिता बावणे, शानूर तांबोळी, गीताबाई आडसूळ, मंदा कदम, प्रा.प.शिपाई विनोद गायकवाड, रामेश्वर वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

सारोळा बु ग्रामपंचायतीच्या वतीने मान्सून पुर्व कामांना सुरूवात



उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करण्याचे काम चालू आहे. तसेच गावात ज्या भागात पाणी साचते अशा भागातील साफसफाई करून घेणे गरजेचे असते त्यामुळे गावातील नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच पावसाळ्यात गावातील व परिसरातील लाईटचा घोटाळा होऊ नये म्हणून तारे जवळची झाडांचे फंटे तोडून घेणे अशा विविध कामांची स्वतः सरपंच प्रशांत रणदिवे यांनी कामाचा आढावा घेऊन सर्व कामे व्यवस्थित करून घेण्यास गेलल्या  पंधरा दिवसांपासून चालू आहे.

१० हजार जनकल्याण सेवक पोहचविणार नागरीकांपर्यंत लोक कल्याणकारी योजना : आ.राणाजगजितसिंह पाटील


देशातील गोरगरीब, दीन – दुबळ्या, सर्वसामान्य लोकांना सन्मानाने जगता यावे, आत्मनिर्भर होता यावे, याकरिता आदरणीय मोदीजी अभिनव योजना राबवित असून त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्याचा संकल्प आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित गरीब कल्याण संमेलनाच्या ऑनलाईन प्रक्षेपणानंतर लाभार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. यावेळी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदीजी मागील आठ वर्षापासून अविरत काम करत आहेत. लोकांची गरज ओळखून मागणी नसतानाही त्यांनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले, गोर गरिब महिलांचे अश्रू पुसण्यासाठी उज्वला गॅस कनेक्शन दिले, मोफत धान्य दिले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक, फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी विना तारण कर्ज दिले. आज देशातील लाखो कुटुंबांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेत हक्काच्या पक्क्या घरांमध्ये प्रवेश केला आहे. गरीबांच्या कल्याणासाठी मोदीजी अहोरात्र काम करत असून ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत.

कोविडच्या कठीण प्रसंगात सर्व वर्गातील देशवासियांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेल्या मोफत लसीमुळेच आज आपण सर्वजण एकत्र बसू शकलोत. देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनेक युवकांनी लाभ मिळविला असून अनेकांचे प्रस्ताव बँकेत दाखल झाले आहेत. जिल्हयातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन आपण १५०० नवीन उद्योग व्यवसायचे ठेवलेले लक्ष ३००० पर्यंत वाढवले आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, आत्मनिर्भर भारत  अशा विविध योजनांच्या माध्यमातून व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवुन प्रत्येकाला लाभ मिळवून देण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब उपस्थित लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र सैनिक श्री विष्णुपंत धाबेकर, बुबासाहेब जाधव, भास्कर नायगावकर, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, तहसीलदार श्री गणेश माळी, गट विकास अधिकारी श्री शेरखाने, सहायक गट विकास अधिकारी श्री तायडे यांच्यासह बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

देवळाली शिवारातील शेतकऱ्याची विद्युत मोटर अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

 

उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली शिवारातील निरंजन पांडुरंग सपकाळ यांच्या शेतातील विहिरीमधील विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सदरील शेतकरी निरंजन सपकाळ हे आपल्या शेतीवरच उपजीविका भागवतात शेतामधून पिकाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये विहीर व बोर असून सध्या बोर बंद आहे. विहीरीवर विद्युत मोटरीचे कनेक्शन असून त्यावर पाणबुडी चे कनेक्शन असून टेक्समो पाच एचपी कंपनीची मोटर बसवलेली आहे. दिनांक ३१ मे रोजी शेतामध्ये जाऊन शेवग्याच्या झाडाला मोटर चालू करून पाणी दिले व संध्याकाळी इलेक्ट्रिक मोटर बंद करून सदरील शेतकरी घरी परतले दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी शेतामध्ये गेले असता त्या ठिकाणी विहिरीवरील मोटर मोटरीचा पाईप कापलेला दिसून आला मोटरी चा शोध घेतले असता विहिरीच्या आजूबाजूला मोटार दिसून आले नाही यावरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील मोटार चोरून नेल्याचे लक्षात आले. विहिरीवरील मोटर व केबल वायर हे दोन्ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले हे समजताच संबंधित शेतकऱ्यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले व सदरील घटनेची माहिती पोलिस ठाण्यांमध्ये देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या 15 कोटी 66 लक्ष किमतीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

  

उस्मानाबाद – दि. 31 मे रोजी कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्याचे 19 किमी अंतर असून त्यामध्ये 

1.     शिराढोण ते रायगव्हाण-जायफळ रस्ता किमी 0/00 ते 5/625 (कामाची किंमत कोटी 29 लक्ष)

2.     बोरवंटी येथील रामा 208 ते बोरवंटी-कोथळा-हिंगणगाव रस्ता किमी 0/00 ते 4/600   

(किंमत कोटी 50 लक्ष)

3.     नागझरवाडी येथील रामा 241 नागरझरवाडी ते तालुका हद्द रस्ता किमी 0/00 ते 6/680

(किंमत कोटी 50 लक्ष)

4.     उपळाई येथील राज्य मार्ग 52 ते उपळाई-संजीतपुर रस्ता किमी 0/00 ते 3/075 (किंमत   

कोटी 32 लक्ष)  

या रस्त्यांचे भुमीपुजन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.  कैलास पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर व शिवसेना तालुकाप्रमुख श्री. शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी राजेश्वर पाटील, बाळासाहेब माकोडे, अजय समुद्रे, प्रदीप मेटे, सचिन काळेसागर बारातेलिंबराज शितोळेसभापती वाघेदत्ता आवाडकिसन भिसेराजाभाऊ आगरकर, रफिक पठाणअविनाश खापेमधुकर गुरुजीमहादेव मगरसागर बारातेमनोज घोगरेरणजित साळुंखेदौलतराव माने, अमोल पाटीलसोमनाथ मडकेमहिपत शेळके, प्रशांत धोंगडेसुरेश मानेनारायण मानेबाबासाहेब उगलेरामहरी मुंडेबळवंत तांबारेअमोल मुर्गे, नितीन पाटीलशंभू बिडवेअवधूत पाटीलनेताजी जावळेनेताजी चव्हाणशहाजी आबा शेळके, कार्यकारी अभियंतासुनीता पाटीलउपअभियंता अजरुद्दीनकनिष्ठ अभियंता धस व नागरिक उपस्थित होते.

शाखाधिकारी भास्कर किवडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार





सलगरा,दि.३१(प्रतिनिधी) 


तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी भास्कर किवडे हे १९८२ सालापासून ते आतापर्यंत केलेल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल दि.३१ मे रोजी त्यांचा उपस्थित बँकेचे कर्मचारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.१९८२ सालापासून ते आतापर्यंत उस्मानाबाद मुख्यालय, मुरूम, तुळजापूर, वाघोली, मंगरूळ, काटगाव आणि शेवटी सलगरा आदी ठिकाणी त्यांनी विविध पदं सांभाळत सेवा दिली आहे. गोरगरीब, वृद्ध, निराधार, शेतकरी सर्वसामान्य ग्राहकांशी प्रामाणिकपणे वागणे, मनमिळावू स्वभाव या मुळे ते पंचक्रोशीत परिचित होते. प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करणे या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. असे मत बोलताना उपस्थितांनी व्यक्त केले.

या वेळी उत्तमराव लोमटे, लक्ष्मण शिंदे, अजित भागवत, रवी सुर्यवंशी, सुपेकर, जांभळे, पाटील, खोपडे,  पवार, नवनाथ कोळी, पिराप्पा कोळी, भुजंग लोमटे, प्रताप मोरे, विक्रम गवारी, व्यंकट पवार, इरफान मुलानी, विशाल लोमटे, मतीन शेख, बाबुराव भोसले, संजय भोसले, 

तसेच तुळजापूर शाखेसह विविध बँकेचे कर्मचारी आणि आदर्श व्यापारी मंडळ तुळजापूर यांच्या सह गावातील काही ग्रामस्थ उपस्थित होते.

रुग्ण कल्याण समितीच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अधिक्षक संजय राठोड यांचा सत्कार

 


उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद करांच्या ब-याच प्रयत्नाने सन २०२२-२३ शैक्षणिक या वर्षापासून सुरू झाले.हे महाविद्यालय शासकीय रुग्णालयातील नविन ईमारतीत चालु झाले. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता (अधिक्षक) मा.संजय राठोड यांचा सत्कार रुग्ण कल्याण समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला, वैद्यकीय महाविद्यालय चालु झाल्याने प्रशासनाचे देखिल आभार मानण्यात आले, वैद्यकीय महाविद्यालयातील सिक्युरिटी,पोलीस चौकी,वाहन पार्किंग,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासहित इतर अन्य आवश्यक बाबींवर देखिल चर्चा करण्यात आली,यात प्रामुख्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,मिशन वात्सल्य समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे,सचीन चौधरी,महादेव माळी, मच्छिंद्र चव्हाण, परिचारिका  अश्विनी गोरे,अभियंता श्री शिवपुजे अन्य इतर उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी



मध्यवर्ती जयंती समितीची भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक

उस्मानाबाद : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297वी जयंती उत्साहात पार पडली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मार्फत भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते या पारंपरिक सवाद्य मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहाल टाॅकीज रोड, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस रोड, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या मिरवणुकीचा मार्ग होता.

खूप दिवसानंतर अतिशय पारंपारिक पध्दतीने, आपल्या जपलेल्या संस्कृतीचा ठेवा सादर करत साजर्‍या झालेल्या. जयंतीला समाजबांधवांनी तुफान गर्दी केली होती. 
पारंपारिक ढोलपथक, वसार्‍या घेवून असणारे वारूवाले या सर्वांच्या पथकांनी केलेल्या सादरीकरणाला लोकांनीही भरभरुन दाद दिली, कौतुक केले. सुधीर पाटील आणि इतर प्रमुख पाहुण्यांनीही तरुणाईसोबत वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरला. धनगर समाजातील नेतेमंडळी तर ढोलकरी बनून मिरवणूक सहभागी झाले.
तत्पूर्वी आ.राणाजगजीतसिंह पाटील व सुधीर पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवींचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, अखिल भारतीय खोखो संघटनेचे सचिव प्रा.डाॅ.चंद्रजीत जाधव, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.बालाजी काकडे, प्रा.डाॅ.कपिल सोनटक्के, प्रा.शिवाजी गाढवे, दिनेश बंडगर, इंद्रजित देवकते, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, गणेश एडके, मुकुंद घुले, श्रीकांत तेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरवणूकीला सर्व समाज बांधवांची गर्दी होऊनही मिरवणूक अतिशय शांत वातावरणात पार पडली. मिरवणूक यशस्वी होण्यासाठी नितीन डुकरे, संदीप वाघमोडे, अशोक गाडेकर, देवा काकडे, किशोर डुकरे, गणेश सोनटक्के, समितीचे सुरेश शिंदे, प्रसाद तेरकर, सचिन चौरे, रवी देवकते, सुरज तांबे, विकी अंधारे, विजय सोनटक्के, प्रशांत लहाडे, नारायण चव्हाण, धनाजी सलगर, युवराज डुकरे, संतोष वतने, सुधीर थोरात, हिराचंद थोरात, नितीन सलगर, योगेश सलगर आदिंनी परिश्रम घेतले.
शेवटी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूकीत सहभागी सर्वांचे प्रा.मनोज डोलारे यांनी आभार मानून मिरवणूकीची सांगता झाली.