Home Blog Page 147

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

 


     उस्मानाबाद,दि.10(प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दि.11 जून 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       शनिवार दि.11 जून 2022 रोजी 4.37 वाजता उस्मानाबाद रेल्वे स्टेशन,उस्मानाबाद येथे आगमन  शासकीय विश्रामगृह,उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.5.00वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन   राखीव.सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथून तुळजापूरकडे मोटारीने प्रयाण.सकाळी 10.00 वाजता तुळजापूर येथे  आगमन  तुळजाभवानी देवीचे दर्शनसकाळी 10.30 वाजता तुळजापूर येथून उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन  राखीव.सायं.5.00 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथून तेरवड,ता.कळंब,उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.तेरखड येथे आगमन  तेरखड,बावी ग्रामपंचायतींना भेट.सायं.7.00 वाजता कळंब येथे आगमन  श्री.राहुल झोरी यांच्या शुभविवाह सोहळयास उपस्थिती.स्थळ:सुरमई मंगल कार्यालय,कळंब,उस्मानाबाद रात्री 8.00 वाजता कळंब,उस्मानाबाद येथून बीडकडे मोटारीने प्रयाण.

जातनिहाय जनगणना करा ओबीसी जनमोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

 बिहार करू शकते तर महाराष्ट्र का नाही?

उस्मानाबाद : बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी ओबीसी जनमोर्चा च्या वतीने आज १० जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. बिहार जातनिहाय जनगणना करू शकते तर प्रगत महाराष्ट्र का करू शकत नाही असा सवाल देखील ओबीसी जनमोर्चाच्या वतीने यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.  

 बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यानी जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली . त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे . बिहारमधील सर्व पक्षाचा पाठींबा मिळवून हा निर्णय त्यांनी घेतला व त्यासाठी ५०० कोटी रुपयाच्या निधीची तरतूदही केली बिहारचे विरोधी पक्ष नेते  तेजस्वी यादव ओबीसी जनगणनेसाठी आग्रही होते त्यानी राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला होता बिहार सरकारने जातनिहाय सर्वेक्षणाचा निर्णय घेतला , त्याबद्दल ओबीसी जनमाचौ तर्फे बिहारचे  मुख्यमंत्री नितीश कुमार व विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव राज्य कार्यकारीणीच्या या बैठकीत संमत करण्यात आला . आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा जातनिहाय जनगणना / सर्वेक्षण झाले पाहिजे , यासाठी जनमोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आग्रह करण्यात येणार आहे . ओबीसींच्या राजकीय सरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लवकरात लवकर राज्य सरकारने सोडवावेत ,  सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य सरकारकडून अद्यापही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही समर्पित आयोगाची नियुक्ती केल्यास आज ३ महिने उलटून गेले प्रत्यक्ष आयोगाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू असून आताशी कुठे बीएलओ मार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे .

 मात्र आवश्यक माहिती गोळा करण्यापूर्वी बीएलओ च्या प्रशिक्षणाची गरज होती . कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता बीएलजींच्या हाती केवळ मतदार यादी देऊन तोंडी सर्वेक्षण सुरु आहे त्यांना ओबीसींच्या जातीची यादीही देण्यात आलेली नाही ज्याच्याकडून सर्वेक्षण करावयाचे आहे ते घरोघरी न जाता एका जागी बसून अंदाजाने ओबीसी मतदार यादी ठरवीत आहेत 

आयोगाच्या सदस्यांमध्येही एकमत नसल्याचे समजते. त्यामुळे जो डाटा गोळा केला जाईल तो कितपत योग्य विश्वासनीय परिपूर्ण असेल याबाबत प्रकाश शेंडगे यांनी शंका व्यक्त केली आहे. 


आयोग सर्वेक्षणाबाबत फारसा गंभीर नसल्याचे दिसून आले आहे  राज्य शासनाने वेळोवेळी लक्ष न घातल्यास ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटणार नाही. 

एम्पिरिकल डेटा परिपूर्ण असावा व तो कोर्टाच्या निकषावर  टिकला पाहिजे ,  तयार केलेला डेटा वेळीच कोर्टात सादर करावा , अशी मागणी आबीसी जनमोर्चा करीत आहे. या डेटा विरोधात सुप्रीम कोर्टात कुणी गेल्यास सरकार नर्फे निष्णात वकीलाची नेमणूक करणार यावी व भविष्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामधील ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करावे . अन्यथा पुढील ५ वर्ष ओबीसी राजकारणातून हद्दपार होईल अशी भीती सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली  

महाराष्ट्र सरकारने समर्पित आयोगाकडून लवकरात लवकर 

 विश्वासह एम्पिरिकल डेटा मिळवावा व बिहार सरकारच्या धर्तीवर ओबीसींचे जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यासाठी पुरेशा निधीचीही तातडीने तरतूद करावी , अशी आग्रही मागणी जनमोर्चा अध्यक्ष  प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली आहे . जातनिहाय जनगनणा करण्यात यावी अशी आग्रही मागणी सदर निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर जिल्हा प्रमुख सचिन सुरेशराव शेंडगे ,अँड. खंडेराव चौरे , इंद्रजित देवकते , पांडुरंग लाटेसर , तालुकाप्रमुख श्रीकांत तेरकर , प्रमोद बचाटे , बालाजी शेंडगे,  पवार दाजी , वैभव हचाटे , देवकते अरविंद , ओमकार देवकते , नवनाथ सोलंकर , सचिन देवकते, रासप जिल्हाध्यक्ष विकास पाटील , संतोष वतने , अहिल्यादेवी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे,  आश्रुबा कोळेकर , जिल्हाध्यक्ष विकास पाटील, रासप जिल्हाध्यक्ष विकास पाटील, सचिन देवकते , नागनाथ बोरगावकर , बालाजी तेरकर , मुकुंद घुगे , अनिल ठोंबरे,  लक्ष्मीकांत खटके, इत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत

मोदी सरकारच्या यशस्वी विकासात्मक कामाची अष्ट वर्षपुर्तीच्या औचित्याने बाईक रॅलीचा झंजावात

 




उस्मानाबाद –


 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने यशस्वी विकासात्म कामाचे ८ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी विकास तीर्थ बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा करीत आहे.  आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुका विकास तीर्थ रॅलीचे नियोजन युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले यांनी केले. वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथून विकास तीर्थ बाईक रॅलीची सुरवात करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन धाराशिव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा चे  जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर व भाजप उपनगराध्यक्ष वाशी सुरेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले व या बाईक रॅलीची वाशी तालुक्यातील जवळपास तीन (०३) जिल्हा परिषद गट आणि सहा (०६) पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावा-गावातुन सुमारे ७५ कि.मी. प्रवास करत कडकनाथवाडी येथे सांगता करण्यात आली. 

या रॅलीच्या अनुषंगाने मागील ८ वर्षात झालेल्या विविध राष्ट्र बळकटीकरणाच्या, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोणातून शेतकरी, लघु उद्योजक महिला, युवती सक्षमीकरणाच्या, व युवा उद्योजक मजबुतीकरणाच्या, आत्मनिर्भर भारत अंतर्गत असंख्य योजना आणि निर्णयांचा गावा गावातील सर्व सामान्य जनते समोर यावेळी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुलदीप भोसले, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष महादेव लोकरे, भाजपा तालुका सरचिटणीस राजगुरू कुकडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुधीर घोलप, प्रसाद मुंडे, आदेश घुले, गणेश कवडे, बापू दिलीप पाटील, अमीत ढालगडे, शहाजी तोरडमल, विशाल उघडे, किशोर तोरडमल, संजय नेमाने, सुजित लोकरे, धनराज नवले, सुहास चौगुले,संतोष गादेकर, स्वप्निल ‍शिलवंत, हनुमंत खोत, नानासाहेब खोत, सुजीत होळे, स्वप्निल  उमरदंड, वैभव भोसले, युवराज पाटील, महेंद्र उंधरे, रविंद्र लोकरे व तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या रैली मध्ये सहभाग घेतला तसेच वाशी तालुक्यातील विविध ठिकाणी ,गावा गावात या बाईक रैलीचे फटाके फोडून ,पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कै. अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयात मुलींनीच मारली बाजी

 

ननवरे बालिका

वाघमारे क्रांती


सलगरा,दि.९(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्या नुसार जिल्ह्याचा निकाल ९७.६९ इतका लागला असून गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण मुलींनीच बाजी मारली आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३६ टक्के इतके आहे. आणि मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १६ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, या मध्ये ८ हजार ९८० मुले तर ७३५० मुलींचा समावेश होता. मात्र प्रत्यक्ष १६ हजार ३४ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. या मध्ये जवळपास २९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती.


त्या मध्ये तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील कै. अंबुमाता महाविद्यालयाचा निकाल बघितला असता या मध्ये पण मुलींनीच बाजी मारली आहे. अंबुमाता महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील १५२ पैकी १४८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा ९७.३६ टक्के इतका निकाल लागला आहे. तर कला शाखेतील ८० पैकी ७२ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेचा ९०.०० टक्के इतका निकाल लागला असून अंबुमाता महाविद्यालयाचा एकूण ९४.८२ टक्के इतका निकाल लागला आहे. १२ वी विज्ञान शाखेतून वाघमारे क्रांती सदाशिव (प्रथम) ८५.१७%, सुपेकर ऐश्वर्या खंडू (द्वितीय) ८४.०० %, भांगे कांचन उदय (द्वितीय)८४.००%

वाले अंजली देवानंद (तृतीय) ८३.००% आणि कला शाखेतून ननवरे बालिका (प्रथम) ७३.६७%, पठाण बिलकिज (द्वितीय) ७१.६६%, आणि गायकवाड प्रतिक्षा (तृतीय) ७०.३४%, या सर्व गुणवंतांचे प्राचार्य ज्ञानेश्वर लोमटे, प्रा.प्रताप मोरे, प्रा. किरण लोमटे, प्रा.अनिल लोमटे, प्रा.बालाजी फुलमाळी, प्रा.फयाज पटेल, प्रा. महादेव लोमटे, प्रा. चव्हाण सिताराम, प्रा.सोमवंशी सुरेश, लिपिक राहुल काटवटे, प्रयोग शाळा सहायक पटेल आर.पी आदींनी कौतुक केले.

उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी

 उस्मानाबाद – गेले काही दिवस रिक्त असलेल्या आणि प्रभारी अधिकाऱ्यावर भार असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आता अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.  त्यांची विद्यमान पदस्थापना अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ही होती. ते २०१५ च्या बॅच चे अधिकारी आहेत.  २०१६ साली सोलापूर ग्रामीण येथे त्यांचा परिक्षाविधिन कालावधी पार पडला तर २०१७ ते २०१९ दरम्यान त्यांनी ठाणे येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच नक्षल विरोधी कारवायांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आहे.

देवळाली येथील गुंड प्रवृत्तीच्या श्रीहरी बापू कडके याची एक वर्षासाठी स्थानबद्धता

 


उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : देवळाली येथील गुंड प्रवृत्तीच्या श्रीहरी बापू कडके उर्फ बापू वय 26 वर्षे, याच्यावर जिल्हाभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वास्तव्यामुळे समाजात दहशत निर्माण होत असल्याने त्यास स्थानबध्द करण्याकामी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी यांनी आज दि. 08 जून रोजी मान्यता देउन ‘महाराष्ट्र झोपडपट्टी, गुंड व विघातक कृत्यांना आळा घालने अधिनियम’ कलम- 3 (2) अंतर्गत कडके याची एक वर्षासाठी स्थानबध्दता मंजुर केली आहे. यावर पोलीसांनी आज तात्काळ कडके यास ताब्यात घेउन त्याची रवानगी ‘हर्सुल मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद’ येथे केली आहे.

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 20 जूनला बैठक

 


         उस्मानाबाद,दि.8(प्रतिनिधी) जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची एप्रिल 2022 ते जून 2022 कालावधीमधील त्रैमासिक बैठक दि. 20 जून 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह सादर करावयाची असल्यास तक्रारी किंवा अभिकथने संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे, त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे पाठवावीत. संबंधित विभागाने किंवा तालुकास्तरीय समितीने कार्यवाही केली नसल्यास जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलण समितीकडे तक्रार सादर करता येईल. तरी याबाबत सर्व कार्यालय प्रमुख, अशासकीय सदस्य आणि सर्व जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

उस्मानाबाद शहरातील भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद

 



उस्मानाबाद –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात सुरु असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्मानाबाद शहरातही ठिकठिकाणी  प्रारंभ झालेला आहे. शहरातील भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला महिला, पुरुष व युवकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.

सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ  राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण, अल्पसंख्यांक विभागाचे असद पठाण, अन्वर शेख व अभियानाचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संघर्ष बनसोडे, लहू बनसोडे, अविनाश शिंगाडे, सागर चव्हाण, सिद्धार्थ सोनवणे, बापू साबळे, यशवंत शिंगाडे, सुगत सोनवणे, अमित बनसोडे, महिला विभागाच्या कमल चव्हाण, पल्लवी बनसोडे, अर्चना शिंगाडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे हात  अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.