अंकले येथे वीज विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाला मोठ्या संखेने उपस्थित रहा: शंकरराव वगरे
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जत( प्रतिनिधी)अंकले येथे लोकवर्गणीतून जिल्हा परिषद मराठी शाळेच्या खोल्या दुरुस्थिकरण व संरक्षण भिंतीचे चे उद्घाटन सोहळा तसेच वीज विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन. प्रधानमंत्री जलजीवन मशीन जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावाला वाड्या वस्त्या आणि गावठाण सहित सुधारित नळपाणी योजना अशा विविध कामाचे उद्घाटन सोमवारी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व माजी आमदार मा. विलासराव जगताप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होनार आहे यावेळी भाजपा चे पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत अंकले पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यसम्राट लोकनेते शंकरराव वगरे सर यांनी केले आहे
अंकले येथील जिल्हा परिषद शाळा येथे अनेक दिवसापासुन वर्ग खोल्या अपुऱ्या असल्यामुळे लहान मुलीना भाड्याच्या वर्ग खोल्या मध्ये शिकवले जात होते, सातत्याने मागणी करूनही शासनाकडून वर्ग खोल्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे श्री शंकर वगरे सर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून तीन शाळा खोल्या दुरुस्त केल्या आहेत.
गेली 25 वर्ष प्रलंबीत अंकले, बाज,बेळुंखी, डोर्ली या चार गावचा विजेचा प्रश्न शंकर वगरे सर यांच्या अथक प्रयत्नाने व जगताप साहेबांच्या माध्यमातून अखेर सुटला
भाजपा जत तालुका उपाध्यक्ष
राजू चौगुले
उस्मानाबाद जिल्हयात सर्वादिक दर आयाण-बाणगंगा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार-अजित पवार
परंडा (भजनदास गुडे) आयाण – बाणगंगा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यतील इतर कारखाण्या पेक्षा जादा दर देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते आजीतदादा पवार यांनी जाहीर केले.
दि१ ऑक्टोबर रोजी ईडा / जवळा (नि) येथील आयाण- बाणगंगा सहकारी साखर कारखाणास्थळी चेरमन मा.आ.राहूल मोटे यांनी ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यासाठी उपस्थीत शेतकऱ्यांना संबोधीत करताना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार म्हणाले परिपक्कव व चांगल्या प्रतीचा ऊस कारखाण्यालाद्या जिल्ह्यतील इतर कारखाण्या पेक्षा जास्त दर देतो असे जाहीर केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले रिकव्हरी कमी करायचे,काटा हाणायचे धंदे आम्ही करत नाही. आमच्या कारखान्यात ऊस आणायच्या आधी कुठल्याही सरकार मान्यता प्राप्त वजन काट्यावर गाडी उभी करून वजन करून आणा यात किलोचा देखील फरक पडणार नाही याची हमी देतो.राहुल मोटे यांनी मला सांगितलं की आपल्या कारखाण्याची ऊस गाळप क्षमता कमी असल्या कारणाने खूप उस उत्पादक शेतकऱ्यांना इच्छा असून देखील आयाण – बाणगंगा कारखान्यात ऊस घालता आला नाही.त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता ४००० टनावरुन ७००० टन परडे करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे.
ऊसाला भाव आणखी कसा जास्त देता येईल यासाठी कोणते जनरेशन लागणार आहे.तेव्हा लवकरच आपण कारखान्याची डिस्टलरी चालू करत आहोत.ज्याच्या माध्यमातून परडे ४ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन कारखाना करू शकेल.सोबतच ३२ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प या ठीकाणी उभारण्याची घोषणा यावेळी पवार यांनी केली.
परिसरातील शेतकऱ्यांनी देखील आता दर्जेदार ऊस उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. ऊस दर्जेदार असेल तर रिकव्हरी चांगली मिळते अन भाव पण चांगला देता येतो.त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आपल्या भागात ऊसाच्या लागवडीसाठी,नवीन उस बेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतील.तसेच गतवर्षी गाळप केलेल्या उसास प्रतिटन २४५१/- रुपयाचा दर देण्यात आला आहे.भविष्यात जादा दर मीळावा यासाठी उस उत्पादक शेतकऱ्यांनी २६५ व्हरायटी उसाच्या ऐवजी ८६०३२,१०००१,१२१२१, ८००५ व्हरायटीच्या उसाची अडसाली उस लागवड करुण जास्ती जास्त उत्पादण घेउन कारखाण्याकडून जास्तीचा दर घ्यावा अशे उस उत्पादक शेतकऱ्यांना पवार यांनी अवहान कले.
कारखाना परिसरात लवकरच वसाहत निर्मितीसाठी काम चालू होणार आहे.त्या माध्येमातून कामगारांना राहायला दर्जेदार घरं लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कारखाणा साईटवर आल्यापासून सगळे नुसते माझेच फोटो काढतायत.कारखान्याचे व कारखाना परिसराचे पण फोटो काढून घ्या.कारण पुढच्या एक वर्षात तुम्हाला कारखाना परिसरात आमूलाग्र बदल झालेला दिसेल असे पवार यांनी सांगीतले.
तसेच उसतोड करताना कसलीही वशीलेबाजी चालणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोडणी साठी घाई करू नये नियमामुसार उस तोडणी साठी कारखाना कर्मचारी आपणाला ऊसतोडीची तारीख आली की ऊसतोड टोळी देऊन उसतोड सुरु करतील असे हि पवार म्हणाले.
या वेळी राहूल मोटे,रणजित मोटे,शिवाजीराव गाढवे, तात्यासाहेब गोरे,मधूकर मोटे,वैशालीताई मोटे, सक्षणा सलगर, स्वाती गायकवाड, जनरल मॅनेजर संतोष तोंडले,मुख्य शेती आधिकारी विठ्ठल मोरे,चिफ इंजिनिअर राजकुमार शिदे,चिफ अकॉंटंट विशाल सरवदे,स्टोअर किपर नानासाहेब जाधव,दादासाहेब पाटील, ॲड.संदिप पाटील,हनुमंत पाटूळे, महादेव खैरे,मा.नगर अध्यक्ष जाकीर सौदागर,नवनाथ जगताप,दत्ता पाटील,भाऊसाहेब खरसडे,हनुमंत कोलते,आशोक पाडुळे,राहूल बनसोडे,बापू मिस्कीन,ॲड सुभाष वेताळ,महेश खुळे,संजय घाडगे, गोविद जाधव, पंकज पाटील, ॲड.नितीन शिदे, सचिन पाटील, हनुमंत कातूरे,रवि मोरे,रविद्र जगताप,मलीक शेख,हनुमंत गायकवाड,अतुल गोफणे,तुषार गोफणे,रोहीदास गोफणे यांच्यासह शेतकरी,वाहाण मालक,वाहातुक ठेकेदार,कारखाना अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक कारखाण्याचे चेअरमन मा.आ.राहूल मोटे यांनी केले तर सुत्र संचलन बाबूराव काळे यांनी केले.
बापाचं सगळंच ऐकू नका आ. विक्रम काळेंचा समीर पाटलांना सल्ला
उस्मानाबाद – एस. पी. शुगरचे संस्थापक असलेल्या सुरेश पाटलांच्या सुपुत्रांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बापाचे सगळंच ऐकू नका असा सल्ला दिल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये तडवळा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एस. पी शुगरच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कोणी तरी एस. पी. शुगर शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याची चिठ्ठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती चिठ्ठी आ. विक्रम काळेंच्या हातात लागली आणि त्यांनी भाषणात समीर पाटील यांना ऊस गाळा, गूळ तयार करा किंवा आणखी काही करा मात्र शेतकऱ्यांना योग्य भाव द्या,तुम्ही तरुण आहात बापाचं सगळंच ऐकू नका असा अजब सल्ला दिला मात्र त्याच सल्ल्यात आजच्या कार्यक्रमाचे मोजमाप दडले आहे, कारखाना ऊसाला भाव देत नसल्याची चर्चा या निमित्ताने कारखाना परिसरात सुरू होती.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांची मुक्ताफळे
विरोधी पक्ष नेते पवार यांनी पाटील यांना झापले
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस पाटील यांनी उधळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याने कुजबूज सुरू झाली. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कधी व कुठल्या काळी पक्ष संपत नसतो. भाजपने दोन जागांच्या बळावर सुरुवात करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा पोकळ गप्पा कोणीही मारू नये असे खडावत सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही असे सुनावत आयोजित मेळाव्यात झापले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले.
विरोधी पक्षनेत्यांच्या मेजवाणीसाठी बाजारपेठेतील कठडे तोडले !
उस्मानाबाद – राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मेजवाणीसाठी बाजारपेठेतील कठडे तोडण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , तडवळा येथील राष्ट्रवादीचे नेत्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला असून मेळाव्यापूर्वी ते तडवळा येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरी स्नेहभोजन करणार आहेत. तिथे जाण्यासाठी जाणारा मार्ग गावातील बाजारपेठेतून जाणारा आहे. पोलिसांनी धोकादायक स्थितीत असलेली वाहने रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणारे ढिगारे, आठवडा बाजारातील वाहन व इ. हे रस्त्यावरुन बाजुला करुन घ्यावे असे पत्र ग्रामपंचायतीला दिले असल्याने त्याच्या आधारे त्यांनी शेतकऱ्यांना गावातील बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी तयार करण्यात आलेले कठडे तोडण्यात आले आहेत. अजित पवार हे माजी अर्थमंत्री आहेत कोरोना काळात त्यांनी राज्याचे आर्थिक नियोजन योग्य केले आहे त्यांना पैश्याचा अपव्यव केलेला आवडत नाही हे अनेकदा दिसून आले आहे मात्र त्यांच्याच दौऱ्यासाठी सरकारी पैशातून शेतकऱ्यांसाठी तयार केलेले कठडे तोडणे त्यांना तरी आवडेल का? शेतकऱ्यांची गैरसोय करून नेत्यांना घरी नेणे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करणे हे जनतेच्या मनाला न पटणारे आहे. गावातील शेतकऱ्यांनी उद्या भाजी विक्रीसाठी कुठे बसायचे? तोडलेले कठडे किती दिवसात पूर्ववत केले जातील? त्याचा खर्च गाव नेत्यांच्या खिशातून करायचा की ग्रामपंचायतीने? असे प्रश्न गावातील नागरिकांना पडत आहे. कामात कसर केली म्हणून अधिकाऱ्यांना खडे बोल सूनवणनारे विरोधीपक्षनेते गाव नेत्यांना खडसावतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना चर्चिला जात आहे.
पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
सलगरा,दि.३०(प्रतिक भोसले)
कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्वांगीन ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत विविध लोकोपयोगी कामाची सुरुवात तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई) गावात दि.२९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यावेळी शेळी व कोंबडी उत्पादक महिला कंपनीचे भूमीपूजन, वृक्षारोपन, नविन बंधारा जल पूजन, जलशुध्दीकरण युनिटचे लोकार्पन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्याधिकारी विलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालिका श्रीमती प्रांजल शिंदे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर चे अधिष्टाता प्रो. रमेश जारे, गट विकास अधिकारी, तुळजापूर जयसिंगराव मरोड यांसह जवळगा मेसाईचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची उपस्थितांनी वृक्षारोपनाने सुरवात करुन नमूद विविध उपक्रमांचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, जिथे मानवी शक्तीने सहज काम होईल तिथे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी, कापडी पिशव्यांचा वापर करावा, पाण्याचा गैरवापर थांबवुन काळजीपूर्वक वापर करावा व इतरांनाही सांगावे, वृक्षारोपण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे, सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात वाटा उचलला पाहिजे. या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक व जाणीवपूर्वक पार पाडून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाला हातभार लावला पाहिजे.
विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनात जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे सुद्धा त्यांनी पटवून दिले.
























































