कामेगाव येथील बुद्ध विहार खुले करण्यासह इतर मागण्यांसाठी आंबेडकरी समाजाचा मोर्चा
उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) – लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील बुद्ध विहार खुले करावे, कसबे तडवळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंबेडकर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२७ सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच त्याचे सभेमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्त्यावरील वाहतूक तब्बल २ तास वनवे करण्यात आली.
या मोर्चाचा प्रारंभ भीमनगर येथील क्रांती चौकातून करण्यात आला. हा मोर्चा त्रिसरण चौकात आल्यानंतर तेथे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तर पोस्ट ऑफिस मार्गे संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जागा देण्यास तयार असताना देखील ही जागा संपादन करण्यास जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शाळेसाठी जमीन संपादन करण्याची कारवाई पूर्ण करून आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याचा मार्ग सुकर करावा. तेर व वडगाव परिसरात पुरातत्त्व विभागकडून उत्खनन करून बौद्ध प्रतीके भारतातील बुद्ध प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करावीत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील प्रांगणात डॉ आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. तसेच तुळजापूर शहरात डॉ आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, उस्मानाबाद येथे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. तसेच आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या लगत असलेले रेल्वे तिकीट घर परिसरातील रिकाम्या जागेत शहरातील सर्व नागरिकांच्या उपयोगात येईल असे उद्यान निर्माण करण्यात यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा किंग कोब्रा दलित संघटनेचे अध्यक्ष भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत या मोर्चाचे नियोजन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चिलवंत, विजय बनसोडे, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, आदिनाथ सरवदे, विशाल शिंगाडे, प्रशांत बनसोडे, पुष्पकांत माळाळे, भाई फुलचंद गायकवाड, जयशिल भालेराव, बाबासाहेब बनसोडे, अशोक कांबळे, गणेश वाघमारे आदीसह बौद्ध महिला व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाचा आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. ते पुढीलप्रमाणे संक्षिप्त स्वरूपात
▶️राज्यात फोर्टिफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करण्यात येणार
▶️पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरण्यात येणार
▶️राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार
▶️नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना सुरू करणार
▶️इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार
▶️इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार
▶️उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविली.
▶️महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय
▶️वणवा, प्राणी किंवा तस्कर-शिकारी यांचा हल्ला, तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करताना वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार
▶️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देणार
▶️राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू
▶️दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय
▶️महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियमात सुधारणेबाबतचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार
▶️एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ
श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा
शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ
उस्मानाबाद,दि.27: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.
तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 29 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. यात, दि.29 सप्टेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 30 सप्टेंबर रोजी ललीत पंचमी निमित्त मुरली अलंकार महापूजा, दि.01 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 02 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.3 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.तत्पूर्वी, काल (सोमवार ) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनातून काढण्यात आली.
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा,
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

































































