जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अधिकृत की अनधिकृत?
धाराशिव – तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे प्रस्तावित एम. आय. डी. सी. ला शेतकरी जमीन न देण्याच्या निर्णयावर ठाम असून आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवू नका असे स्पष्ट निवेदन देत त्यांनी प्रशासनाला त्यांची भूमिका खदखद कळवली, मात्र यात एक झाले तामलवाडीच्या शेतकऱ्यांना एम आय डी सी जमिनीसाठी २५ ते ३० लाख मिळणार असे सांगण्यात आले होते ते खोटे ठरले आहे. २५ ते ३० लाख रुपये एकरी मिळणार असे प्रशासनाने लेखी कळवले नसल्याने हा आकडा कोणी आणला? का आणला? त्यात कोणाचा फायदा? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने कुठेही एकरी ३० लाख मिळणार असल्याचा प्राथमिक नजर अंदाज असल्याचे अधिकृत रित्या सांगितले नसताना तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींनी माध्यमांना सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी याबाबत साशंकता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, वारंवार (आम्हाला आधी सूचनेतील अधिनियमच्या कलम ३२ (२) च्या व्यक्तिगत नोटीसला दिनांक २०/८/२०२४ रोजी लेखी व दिनांक २३/१/२०२५ रोजी व दिनांक २२/५/२०२५ रोजी मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना समक्ष लेखी व तोंडी कळवले आहे.) तामलवाडी येथील नियोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासकीय व निमशासकीय बैठकीस बोलले जाते.
परंतु आम्ही सर्व शेतकरी सरकारी कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता आमच्या जमिनी वडिलोपार्जित व आम्ही सर्व भूमिहीन होणार असल्यामुळे आम्हाला मोबदल्याची कोणतेही अपेक्षा नाही. त्यामुळे आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक महामंडळासाठी भूसंपादित होऊ देणार नाहीत. त्यामुळे आमच्या खालील सही करणार सर्व शेतकरी यांची कोणत्याही प्रकारचे सहमती नसल्यामुळे येथून पुढील कोणत्याही बैठकीसाठी बोलवण्यात येऊ नये. निवेदनावर निवेदनावर नागेश भाकरे, सचिन शिंदे, राधा भोसले, दत्ता घोटकर, दत्तात्रय जाधव, बाबासाहेब जगताप, उषा जगताप, समाधान घोटकर महादेव घोटकर, मोईन बेगडे, शिवाजी रणसुरे सुरेश जाधव ,शारदाबाई जाधव, लक्ष्मीबाई मर्ढेकर तुकाराम सगर यांच्या सह्या आहेत.
- 1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच
- भुम शहरात ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी लागू — आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी समिती गठीत – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला
- दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई, तीन आरोपींना अटक