हतबल झालेल्या शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीची परवानगी

0
46

नळदुर्ग :-  शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात जात आहे. दारू विक्रीतून अर्थकारण मजबूत होत असेल तर गांजा लागवडीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल यासाठी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील एका तरुण
शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली दिले आहे. गणेश गायकवाड असे या शेतकऱ्याचे
नाव आहे. उत्तराखंडच्या सरकारने २०१५ साली गांजाची लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. गांजा हा काही केवळ नशा करण्यासाठीच वापरला जात असतो,असे नाही. तो औषधासाठीही वापरतात. उत्तराखंड सरकारने गांजा लावायला सरकारने परवानगी दिली आहे. सध्या कोरोनामुळे सगळे जग थांबले आहे. मात्र, शेतकरी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करुन शेती पिकतोय. मात्र शेतकऱ्याने पिकवलेल्या शेत मालास योग्य भाव मिळत नाही. भाजीपाल तर फेकून देण्याची वेळ आली आहे. दारू विक्रीतुन देशाची राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असेल तर गांजा पिकवल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरेल. ज्या पद्धतीने आपण दारूच्या निर्मितीसाठी आणि विक्रीसाठी दुकानांना परवानगी देतो त्याप्रमाणे देशभरात शेतकऱ्यांना गांजा लागवड करण्याचे परवाने द्यावे. यामुळे गांजाची चोरटी शेती होणार नाही आणि यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे. शासनाना जर गांज्याला परवानगी दिली तर माझ्यासह सर्व शेतकरी बांधवांची अर्थव्यवस्था सुधारेल व आत्महत्या थांबतील, असे गणेश गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here