धाराशिव – जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या आणि शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक देखील झाली त्यात सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या मात्र कंपन्यांवर अन्याय होत असल्याचे भासवत जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींनी आज ,विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट घेतली.
विशेष पोलिस महानिरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत याची शेतकऱ्यांना साधी कल्पना नसताना पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पुढे जात निवेदनाचे वापरलेल्या दबावतंत्रात शेतकऱ्यांना फटका बसू नये हीच अपेक्षा आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याला धमकवल्या प्रकरणी ज्या कंपनी प्रतिनिधीवर गुन्हा दाखल आहे ती व्यक्ती देखील निवेदन देताना पोलिस अधीक्षक कार्यालयात होती. पवनचक्की प्रकरणात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असताना पोलिस विभागाने केवळ कंपन्यांच्या प्रतिनिधींची आणि पोलिस महानिरीक्षक यांची भेट घडवून संवादाचे रूप देणे हे शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे बोलले जात आहे.

आपण काही कमी नाहीत हे त्यांना माहिती नाही का?
पोलीस आयुक्त जिल्हा पोलिस कार्यालयात आले तेव्हा अभ्यागत कक्षात दहा पंधरा व्यक्ती निवेदनाबाबत चर्चा करत होते त्यातील सफारी परिधान केलेला व्यक्ती आपण काही कमी नाहीत हे त्यांना माहिती नाही का? या आशयाने बोलत होता ती व्यक्ती नेमकी विभागीय पोलिस आयुक्तांना म्हणत होती की पोलिस यंत्रणेला हा संशोधनाचा भाग मात्र जमलेल्या व्यक्तीमध्ये जो आत्मविश्वास होता तो पाहता कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी प्रशासनासमोर नमनार नाहीत अशी परिस्थिती होती. एकंदरीत कंपन्यांनी निवेदनात ज्या बाबी मांडल्या आहेत त्या समोर येणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाची प्रेस नोट द्वारे भूमिका
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योजकांचे प्रामुख्याने पवन व सौर हरित उर्जा प्रकल्पांचे प्रतिनिधी यांची विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या समवेत पोलीस अधिक्षक दालनात बैठक घेण्यात आली सदर बैठकी मध्ये एकुण 45 प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या नविन धोरणानुसार औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुक कशी करता येईल त्याबाबत शासन आग्रही आहे. जिल्ह्यामध्ये पवन सौर हरित उर्जचे अनेक प्रकल्प चालू असुन त्यातील बहुतेक प्रकल्पांना जमिन संबंधीत प्रशन्न उपस्थित होतात. संबंधीत उर्जा प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक पोलीस व शेत करऱ्यांशी सौर्धाहाचे संबंध प्रस्थापित करावे. तसेच प्रशासनाशी संपर्कात रहावे. मालमत्तेचे संरक्षण करणे ही सर्वात प्रथम कर्तव्य संबंधीत कंपनीचे असुन त्यासाठी त्यांनी योग्य सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणे CCTV बसविणे, कंपाऊड करणे इत्यादी उपायोजणा करणे अपेक्षित आहे.जर असामाजिक तत्वे खंडणी उखळत असतील तर वेळेवर पोलीसांना कळविणे गरजेचे आहे. दिवाणी बाबी मध्ये पोलीस प्रशासन हस्तक्षेप करणार नाही. त्याकरीता संबंधीत येत्रंणेकडे दाद मागावी. उपविभागीय स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असुन संबंधीतांनी त्यांचे कडे दाद मागावी असे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी सुचना दिल्या. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेसह प्रतिनिधी उपस्थित होते.