मुंबई – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (PDS) अन्नधान्याचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, दुकानदारांना मिळणारे सध्याचे ₹१५०/- प्रति क्विंटल (₹१५००/- प्रति मेट्रिक टन) मार्जिन आता वाढवून ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७००/- प्रति मेट्रिक टन) करण्यात आले आहे.
२०१७ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जुन्या दरानुसार दुकानदारांना केंद्र शासनाचा ₹४५/- व राज्य शासनाचा ₹१०५/- असा मिळून एकूण ₹१५०/- मार्जिन मिळत होते. वाढीव खर्च लक्षात घेऊन रास्त भाव दुकानदार संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली.
सुमारे ५३,९१० रास्त भाव दुकानदारांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असून वाढीव खर्चाची तरतूद संबंधित अर्थसंकल्पीय शिर्षाखाली करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ही वाढ तत्काळ लागू होणार आहे.
- मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !
- चार ठिकाणी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका आ. राणाजगजितसिंह पाटील
- सामाजिक वनीकरणातील अधिकाऱ्यांची ॲडव्हान्स सही लागवड..!
- नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुक २०२५ : तुळजापूर–धाराशिव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई
- प्रि जीबी, पत्रकारांना मज्जाव धाराशिव नगरपालिकेचा असाही इतिहास
