Home Blog Page 38

अंतिम नोटीस दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी पुन्हा कारणे दाखवा नोटीस


धाराशिव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप



धाराशिव, दि. ३० (आकाश नरोटे)

जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांचा अजब कारभार समोर आला आहे. कार्यालयांतर्गत असणाऱ्या वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस, पीयूसी काढणे याची जबाबदारी असणाऱ्या उप अभियंता एस. पी. शिंदे यांना २१ ऑगस्ट रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षीत असताना कार्यकारी अभियंत्यांना वेगळीच कार्यपध्दती शोधून काढली आहे. अंतिम कारणे दाखवा नोटिशीनुसार कारवाई करण्याऐवजी दि. २३ सप्टेंबर रोजी पुन्हा कारणे दाखवा नोटीस काढून प्रशासकीय कार्यवाहीचा नवीन प्रताप आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसाठी हातपंप दुरुस्तीसाठी पंचायत समिती स्तरावर वेगवेगळी सहा वाहने देण्यात आली आहेत. त्या वाहनाचा विमा काढणे, फिटनेस पीयूसी काढणे याची जबाबदारी  उप अभियंता यांत्रिकी  यांची आहे. मात्र उप अभियंता यांनी हे कर्तव्य पार न पाडल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना ५२ हजाराचा दंड देखील ठोठावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सचिन सर्जे यांच्या तक्रारीवरून सुरू असून पहिली तक्रार त्यांनी ०३ मे रोजी केली त्यावर उप अभियंता यांना पहिलं पत्र ११ जून रोजी काढण्यात आले. त्यानंतर दुसरे पत्र १८ जून रोजी कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता यांना काढले त्यांनतर २१ ऑगस्ट रोजी उप अभियंता यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली.त्यात
कार्यालयांतर्गत शासकीय वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस व पीयुसी काढणे हे आपले अभिप्रेतः कर्तव्य असताना तशी कार्यवाही न करता वाहने नियमबाह्यपणे चालू ठेवुन कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी सिध्द होत असल्याचे म्हटले आहे.  सुचना देवुनही वरील बाबी प्रलंबीत ठेवलेल्या आहेत.
यावरुन उपअभियंता शासकीय नियमांचे व वरीष्ठांच्या सुचना व आदेशांचे उलंघन करत असल्याचे
स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत खुलासा सादर न केल्यास किंवा समाधानकारक व वेळेत सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन आपणा विरुध्द संदर्भीय नियमानुसार सक्त शिस्तभंग विषयक कार्यवाही अनुसरली जाईल असा सज्जड इशारा देखील देण्यात आला होता  तसेच खुलासा सादर न केल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे व शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. असे असून देखील कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा २३ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस काढल्याने प्रशासकीय पत्राचा हा खेळ नेमका कशासाठी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ही वाहने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावाने आहेत. तरी प्रकरणांत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलदगतीने कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणात न्यायालयात जाणार आहे. सचिन सर्जे, तक्रारदार

PMFBY चे पोर्टल बंद कृषी आयुक्तालयाच्या विमा कंपन्यांना सूचना

धाराशिव –

पिकाचे नुकसान झाले तर पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मदत मिळते मात्र त्यासाठी नुकसान झाल्याच्या ७२ तासाच्या आत तक्रार करावी लागते मात्र तक्रार करण्यासाठीची वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांना तक्रार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना पत्र काढत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ हंगामात, दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसान बाबी अंतर्गत विमा कंपनीला नुकसानीच्या सूचना देत आहेत.

मात्र दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री पासून PMFBY पोर्टल बंद असल्यामुळे शेतकरी सूचना देऊ शकत नाही. या परिस्थितीत जेवढ्या कालावधीसाठी पोर्टल बंद आहे, तो कालावधी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सूचना देण्यासाठी ७२ तासाची मुदतीमध्ये गृहीत धरला जाणार नाही याची सर्व विमा कंपन्यांनी नोंद घ्यावी, विमा कंपन्यांनी त्यांचे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्यामार्फत हा संदेश सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अश्या सूचना कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

नागज फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांचा दोन तास रास्ता रोको

माजी खासदार संजय (काका) पाटील यांनी लेखी पत्राद्वारे व रोहित पाटील यांनी फोन व्दारे पाठिंबा दिला.

कवठेमहांकाळ,दि.२४.(तानाजी शिंगाडे)

राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी कवठेमहांकळ येथील रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग नागज फाट्यावर सोमवारी (ता. २३) धनगर समाज बांधवांनी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. शेवटी तहसीलदार प्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित व्हावे या करिता पंढरपूर या ठिकाणी 14 दिवसापासून आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन होणार असल्याचे म्हटले आहे.तसेच महाराष्ट्रातील आदिवासी असलेला धनगर समाज कायम अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे. धनगरसमाजासाठी हक्काचे अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा,अन्यथा धनगर समाज पेटून उठल्या शिवाय राहणार नाही, असे नमूद केले आहे.

यावेळी रास्ता – रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वसंत कोळेकर गुरुजी,माजी सभापती अजितदादा कारंडे, माजी सभापती विकास हक्के, पैलवान नितीन आमुने, सुर्यकांत ओलेकर, सुरेश घागरे, राहुल गावडे,सुभाष खांडेकर यांच्या सह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनात माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर, उपसभापती रावसाहेब पाटील,जनाप्पा खताळ, संजय दाईगडे, दत्ता पाटील, दादासाहेब चोरमुले, कोंडिबा पाटील,संजय घागरे, संजय खरात,गटुभाऊ ओलेकर,
युवराज घागरे, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सरपंच रमेश कोळेकर, महादेव यमगर, पांडुरंग यमगर,दिपक कोळेकर, मंजुनाथ कोळेकर अमोल ओलेकर, भारत माने, अवधुत ओलेकर, राघू शिंदे, संभाजी शिंदे, निवृत्ती इरकर,आदींसह असंख्य सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

ईट येथे खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाची जोरदार तयारी


ईट ( सोमेश्वर स्वामी)
महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता धमाल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय दादा सावंत यांच्या मित्र मंडळ कडून ईट येथे करण्यात आलेले आहे . हा कार्यक्रम खास सेने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याची जोरदार तयारीकरण्यात आली आहे .याची पाहणी शिवशक्ती कारखान्याचे सर्वेसर्वा केशव सावंत यांच्याकडून करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवाजी तात्या भोईटे,धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक प्रवीण देशमुख,युवा सेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण ,ईश्वर आबा देशमुख व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन जि.प प्रशाला ईट शाळेच्या प्रांगणात करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमात प्रथम पारितोषक फ्रीज,द्वितीय टीव्ही,तृतीय वॉशिंग मशीन, चतुर्थ पिठाचीचक्की व पाचवे बक्षीस शिलाई मशीन दिले जाणार आहे.
उपस्थित राहणाऱ्या सर्वच महिलांना साडीची भेट दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एक दिवस मनोरंजन व्हावे यासाठी ही होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली आहे . त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे अवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे .

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुल चा दबदबा

४३ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी(रिधोरे)
युवक कल्याण व क्रीडा संचालनालय,महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय,सोलापूर आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुलच्या खेळाडूंनी कौशल्य दाखवत यश संपादन केले.या स्पर्धेतून गुरुकुलच्या एकूण ४३ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड झालेले खेळाडू: १४ वर्षे मुले: राज पवार,सोमनाथ लोकरे, श्रेयश राखुंडे,आर्यन सागर,वीर घाडगे,रोहन भोसले,आर्यन भोसले,सोमनाथ लोकरे, पृथ्वीराज घावटे,आर्यन सागर यांनी यश संपादन केले.
१७ वर्षे मुली गटात राजनंदनी घोलप,१७ वर्षीय मुले गटात गौरव धालगडे,आशिष धचडगे,रोहित मैदाड,हर्ष लोखंडे,रोहित लिमकर,सोहम जव्हेरी,ओम पाटील,रोहित लिमकर,गौरव धालगडे,अभिनव निकम,सोहम जव्हेरी,पृथ्वीराज हासवले,मयूर,सुयोग यादव,रोहित मैंदाड,रोहित मैंदाड,हर्ष लोखंडे हर्ष लोखंडे, गौरव धालगडे,गौरव धालगडे,अभिनव निकम,ओम पाटील,आशिष धबडगे, ओम पाटील, समर्थ ढोबळे,सिद्धेश्वर कारंडे,विनायक कदम,सिद्धेश्वर कारंडे,पृथ्वीराज बागल व सुयोग यादव,१९ वर्षीय मुली गटात वर्षा सोनटक्के,धनश्री सातपुते,वर्षा सोनटक्के,१९ वर्षीय मुले गटात स्वप्निल लोहार,शुभम खैरे, अजिंक्य गायकवाड,विघ्नेश गुरव, महेश चौरे,स्वप्नील लोहार,सुयोग यादव,अक्षय शेंबडे,समर्थ कोकाटे,साहिल केसरे,स्वप्निल लोहार,स्वप्निल लोहार,अक्षय शेंबडे व महेश चौरे,महेश चौरे, अक्षय शेंबडे,अक्षय शेंबडे व महेश चौरे,शिवम खैरे,सुमित लोंढे, महेश शिरगिरे यांनी यश संपादन केले.
या खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक जे.बी.शिंदे,गणेश वडेकर, बालाजी जाधवर,अभिषेक कुणाल यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी सचिव वर्षाताई घाडगे,प्राचार्य संदेश कदम,प्रशासकीय अधिकारी किशोर कदम उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न

परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमास महिलांचा

परंडा (प्रतिनिधी) गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणींसाठी क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून धनंजय सावंत मित्र परिवार परंडा,भुम,वाशी यांच्या वतीने दि.१३सप्टेंबर रोजी परंडा येथील राजवीरा लॉन्स येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांना एक अगळे वेगळे व्यासपिठ मिळाले.यावेळी वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ महिलांसाठी घेण्यात आले. यावेळी संगिताच्या तालावर महीलांनी ठेका धरला होता. मोठ्या संख्येने महीला गाण्याच्या तालावर थिरकल्या होत्या.परंडा शहरात महीलांसाठी परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन सावंत यांच्या वतीने करण्यात आले होते.माहिलां साठी मनोरंजक कार्यक्रम परंडा शहरात प्रथम घेण्यात आल्या मुळे या कार्यक्रमाला परंडा शहरासह तालुक्यातील महीलांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमात पाच मोठया बक्षीसावेती रिक्त उपस्थित प्रत्येक महिलेस एक पैठणी भेट देण्यात आली.या प्रथम बक्षिस फ्रिजच्या शोभा सुर्यकांत सांगळे,व्दितीय बक्षिस एलईडी टीव्हीच्या मनिषा आमोल क्षिरसागर,तृतीय बक्षिस वॉशिंग मशीन निकीता मिलींद बनसाडे,चतुर्थ बक्षीस आटा चक्की वैष्णावी केतन भोसले, पाचवे बक्षिस शिलाई मशीन पारीतोशीकाच्या मानकरी आर्चना बालाजी गायकवाड ठरल्या आहेत.तर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी झालेल प्रत्येक महीलेला पैठणीसाडी भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात परंडा शहरासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम यशस्विपार पाडण्यासाठी युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहूल डोके व त्याच्या सहकाऱ्यानी परिश्नम घेतले.

भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने वाकडी येथे शेत रस्ता कामास प्रारंभ

परंडा (प्रतिनिधी) आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली परंडा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याची कामे भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत.
दि.१२ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील वाकडी येथे शेतरस्ता कामास सुरुवात करण्यात आली.रस्ता परिसरातील शेतकऱ्यांना या रस्त्याची गरज होती.परंतु हा रस्ता शासकिय नियमात बसत नव्हता म्हणुन भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या सोईसाठी करूण देण्यात येत आहे.
वाकडी येथील शेतकऱ्यांनी शेत रस्त्याची मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या कडे केली होती, शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी कसल्याही प्रकारचा विलंब न लावता स्वखर्चातून या रस्ता कामास दि.१२ सप्टेंबर रोजी आपली यंत्रणा कामाला लावून रस्ता कामाला सुरुवात केली.सदरील रस्ता काम सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन

परंडा (प्रतिनिधी)
गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणीं साठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत व बाल गायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय सावंत मित्र परिवार परंडा,भुम वाशी यांच्या वतीने दि१३सप्टेंबर रोजी परंडा येथील राजवीरा लॉन्स येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रथम बक्षिस फ्रिज,व्दितीय बक्षिस एलईडी टीव्ही,तृतीय बक्षिस वॉशिंग मशीन,चतुर्थ बक्षीस आटा चक्की,पाचवे बक्षिस शिलाई मशीन असे असणार आहे.तर या खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महीला भगिणीस आकर्षक साडी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारे टिव्ही फेम बालगायिका सह्याद्री मळेगावकर व सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
तरी सदरील कार्यक्रमात परंडा,भुम,वाशी तालुक्यातील सर्व लाडक्या महीला भगिणीनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेऊन शोभा वाढवावी अशी विनंती धनंजय सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम


धाराशिव – प्रलंबित मागण्यासाठी एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. उद्या पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे १४ संघटनाच्या एकत्रित कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी कर्मचारी कामावर जाणार की नाही याबाबत ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून कामावर न जाण्याचा काही कर्मचाऱ्यांचा पवित्रा असल्याने त्याचा बसेसवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

या आहेत मागण्या

राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे रा.प. कामगारांना वेतन देण्यात यावे.

२) महागाई भत्याची माहे जुलै, २०१८ ते जानेवारी, २०२४ या कालावधीची थकबाकी अद्याप रा.प. कामगारांना मिळोलली नाही. सदरची सर्व थकबाकी कामगारांना त्वरीत मिळणे आवश्यक आहे.

३) शासकीय कर्मचा-यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर रा.प. कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतुद असतानाही त्यामध्ये प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत रा.प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६,२४ टक्के माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के माहे नोव्हेंबर २०२१ पासून रा.प. कामगारांना लागू केला. परंतु माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२९ या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची व घरभाडे भत्याची थकबाकी रा.प. कामगारांना अ‌द्याप मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी.

४) सन २०१६-२०२० या कालावधीसाठी वेतनवाढीपोटी रु.४८४९ कोटी जाहिर केले. सदर रु.४८४९ कोटीचे पुर्ण वाटपही झालेले नाही. तरी रु.४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कमेचे कामगारांना वाटप करण्यात यावे.

५) एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात माहे नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे रु.५०००/-, रु.४०००/- व रु.२५००/- वाढ करण्यात आली. परंतु अशी वाढ देताना सेवा जेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. सदरच्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट रु.५०००/- लागू करण्यात यावेत.

६) सध्या एस.टी. कामगारांना लागू असलेल्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या योजने ऐवजी कॅशलेस योजना (इनडोर/आऊटडोर) एस.टी. कामगारांना लागू करण्यात यावी.

७) एस.टी. कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या एस. टी. बसेस मध्ये मोफत पासची सवलत फरक न भरता लागू करण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त एस.टी. कामगारांना ६ महिन्या ऐवजी १ वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एस.टी. बसेस मध्ये उपलब्ध करून देण्यात यावा. अश्या मागण्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे केल्या आहेत.

अवैध पिस्टल सह तीन आरोपीना अटक परंडा शहरातील घटना;परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परंडा ( प्रतिनिधी ) अवैध पिस्टल बाळगणाऱ्या परंडा शहरातील तिन तरुणांना विरोधात
परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीनीही आरोपीना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे हे दि ३०ऑगष्ट रोजी रात्री गस्त घालत असताना माळी गल्ली परिसरात काही तरुणाने अवैध पिस्टल बाळगले असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अधारावर पोलिस पथकाने माळी गल्ली परिसरातून आरोपी ओंकार शंकर सुतार,ऋषीकेश तानाजी गायकवाड,शहाजी बाळू माळी सर्व राहणार परंडा यांना रात्री ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी कडे अवैध पणे बाळगलेले पिस्टल पोलिसांना आढळून आले पिस्टल जप्त करून सर्व आरोपी विरूद्ध दि ३१ ऑगष्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीना ३१ ऑगष्ट रोजी परंडा न्यायालयात हजर केले असता तिन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे
पोलिस अधिक्षक संजय जाधव,अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन,उपविभागीय पोलिस अधिकारी हिरेमठ यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सपोनि कविता मुसळे करीत आहेत.