भूम – काळाच्या ओघाप्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे कृषिचा कोणताही उद्योग एका कडे न राहता शंभर जणांकडे असला पाहिजे तरच गोरगरीब व मध्यमवर्गीय तारला जाईल हे बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या- अॅड. प्रकाश आंबेडकर
तुळजापुरातून आ.चव्हाण की, आ.राणाजगजितसिंह पाटील ?
बंजारा क्रांती दलाने वंचित बहुजन आघाडीला झिडकारून भाजपाला दिले जाहीर समर्थन
वेळी भाजपचे विजय दंडनाईक, गणेश सोनटक्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य सौ.उषा यरकळ, टिकले गुरुजी, अड. रमेश भोसले, सुरजित राऊत – माजी प.स. सदस्य, पोपट राऊत ग्राम समिती सदस्य, विजय फंड, रमेश शिंदे, वाणे वाडीचे माजी सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच प्रमोद उंबरे, सुधाकर अबदारे, इत्यादी उपस्थित होते.
बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची भूम येथे जाहीर सभा
निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर हादरा फुलवाडी सरपंच-उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून; देवानंद रोचकरींनी कसली कंबर
भगव्या च्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्याना माफ करू नका- उध्दव ठाकरे
उस्मानाबाद- भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफ करू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन शिवसेनाप्रमुख उदधव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील सभेत करत पक्ष सोडून जनाऱ्यांवर टीका केली
शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे उस्मानाबाद येथे आले होते. १० रुपयात थाळी, १ रुपयात आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, महाविद्यालयीन तरुणींना मोफत शिक्षण व बससेवा हा शिवसेनेचा वचननामा जनतेपुढे मांडला. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही खरपूस टीका केली.
सभेसाठी परीक्षेची वेळ बदलली
उध्दव ठाकरे यांची सभा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात झाली मात्र तत्पूर्वी शाळेत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ बदलली, तसेच सभा होत असलेल्या परिसरात इतर शाळा व महविद्यालयाच्या परीक्षा चालू असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
नळदुर्ग नगरपालीकेतील अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
नळदुर्ग :- अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या 5 नगरसेवकांनी अशोक जगदाळे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले आहे. कार्यकर्त्यांसह काही नेते सकाळी, दुपारी व संध्याकाळी वेगवेगळ्या प्रचार कार्यालयात दिसत आहेत. त्यामुळे हे राजकीय कार्यकर्ते व नेते नेमके कोणत्या पक्षाचे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तसेच मतदारसंघात दररोज वेगवेगळी समीकरणे जुळत व बिघडत आहेत. अशीच काही राजकीय समीकरणे जुडल्यामुळे नळदुर्ग शहराच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आला आहे.त्याची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे तुळजापूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या 5 नगरसेवकांनी बंड पुकारत ऐनवेळी पाठ फिरवून गायब झाल्यामुळे झाली. त्यामुळे अशोक जगदाळे यांच्या तंबूत खळबळ उडाली होती. हे नगरसेवक तेव्हापासून अशोक जगदाळे यांच्याशी अंतर ठेवून नॉटरिचेबल असल्याने तर्क वितर्क लावले जात होते. मात्र अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर गायब असलेले 5 नगरसेवकांनी नळदुर्ग येथे 12 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नळदुर्ग येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याने अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आमदारकीचे स्वप्न पाहणारे तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना मोठा झटका बसला आहे.कारण अशोक जगदाळे यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळी त्यांची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी व इतर 1 असे तीन नगरसेवक वगळता नगरपालिकेतील गटनेता तथा नगरसेवक निरंजन राठोड, उपनगराध्यक्षा शाहीन मासुलदार, नगरसेवक दयानंद बनसोडे, आसिफा बेगम काजी, सुनंदा जाधव हे पाच नगरसेवकांनी त्यांची साथ सोडणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे हे नगरसेवक कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कारण 3 वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला नळदुर्गकरांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन 12 नगरसेवक 1 नगराध्यक्ष असे 13 जणांना निवडून देऊन सत्ता दिली होती. मात्र काही वर्षांनंतर अशोक जगदाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांचे एकदम जवळचे 4 नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारत बंडखोरी केली होती. ते नगरसेवक यापूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे समर्थक असलेले 9 नगरसेवकांनी साथ सोडल्या मुळे 3 नगरसेवक व 1 नगराध्यक्षा आता शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी 1 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून अशोक जगदाळे यांच्यापासून अंतर ठेवून नॉटरिचेबल आहे. त्यामुळे नळदुर्ग नगरपालिकेत अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला पडलेल्या खिंडारामुळे त्यांचा राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यात काही शंका नाही. तसेच नळदुर्ग शहराच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असलेला 1 मोठा मासा येणाऱ्या काही दिवसात आपल्या 2 समर्थक नगरसेवकासह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तुळजापुरात भाजपचे बेरजेचे राजकारण !
उस्मानाबाद – निवडणुका म्हटल्या की पक्ष बदला बदली, बंडखोरांचे बंड या साऱ्या घटना आल्या. परंतु तुळजापूर मतदारसंघात सध्या वेगळे चित्र आहे.आचारसंहितेपूर्वी रोहन देशमुख, देवानंद रोचकरी अश्या तगड्या लोकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती.मात्र भाजपने माजी मंत्री राणाजगजिसिंह पाटील यांना उमेदवारी दिली.या उमेदवारी नंतर भाजपमध्ये बंडखोरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र देवानंद रोचकरी यांनी राणाजगजिसिंह पाटील यांना पाठिंबा दिला तसेच रोहन देशमुख यांनीही मेळावा घेऊन भाजप एकत्रित असल्याचे दाखवून दिले. १० ऑक्टोबर ला झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत दीपक आलुरे आणि गणेश सोनटक्के यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. दोघांचीही तुळजापूर तालुक्यात ताकद आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवसेनेचे कार्यकर्ते काही काळ प्रचारापासून अलिप्त होते मात्र त्यांनीही युती धर्म पळूनी कामाला सुरुवात केली. या पूर्वीच्या निवडणुकीत अा. चव्हाण यांच्यासमोर अनेक उमेदवारांचे आव्हान असायचे त्याच्यांत मतविभाजन होऊन निवडणूक जिंकणे त्यांना सहज सोप्प असायचं. यापूर्वी विभाजनाचा फायदा हाताला होत होता. मात्र शमलेली बंडखोरी मतदारसंघातील वजन असलेले नेते यांचा भाजप प्रवेश यातून भाजपने आखलेले बेरजेचे राजकारण येत्या २१ तारखेला काय किमया दाखवते ते पाहावे लागेल.
कार्यकर्ते झाले चार्ज
गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपूर्वी लढत कशी होईल याबाबत भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या मध्ये साशंकता होती मात्र सभेमध्ये शहा यांनी तुळजापूरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्याचे दिलेले आश्वासन तसेच २१ टी एम सी पाणी आदी स्थानिक मुद्द्यानाही प्राधान्य दिले यामुळे युतीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत
महाराष्ट्रात १८ ठिकाणी होणार अमित शहांच्या सभा पैकी तुळजापूर साठी एक
महाराष्ट्रात विधानसभेचा आखाडा पेटला आहे. भाजपने आपली ताकद पणाला लावली असून गृहमंत्री अमित शहा १० तारखेला तुळजापूर मतदार संघात महायुतीचे उमेदवार राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत महायुतीत २८८ पैकी १६४ भाजपकडे आहेत. गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्रात एकूण १८ सभा होणार आहेत त्यापैकी एक तुळजापूर मतदारसंघात होणार असल्याने या मतदारसंघासाठी भाजप किती प्रयत्नशील आहे हे दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात चार मतदार संघापैकी एकच भाजपकडे आहे. तो जिंकण्यासाठी भाजप चांगलाच तयारीला लागला आहे. प्रचारात केंद्रीय नेतृत्वाची साथ लाभल्याने राणाजगजिसिंह पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी अशीच साथ मिळाल्यास जिल्ह्यासाठी चांगली बाब असल्याचे जाणकार सांगतात. मात्र आघडीचे उमेदवार मधुकरराव यांच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही मोठ्या नेत्याच्या सभेचे अद्याप पर्यंत नियोजन नाही. इतर उमेदवार सभांपेक्षा वैयक्तिक भेटीगाठीवर भर देत आहेत.








