उस्मानाबाद – राजीव गांधी नगर येथील नगरपालिका मार्फत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजीव गांधी नगर येथे होत असलेल्या रोड व नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तुपसुंदरे, प्रशांत पवार,अजय मोरे,अमोल राजेनिंबाळकर, दयानंद सांडसे, शिवाजी कदम, प्रशांत कदम,दिलीपसिंह राजपूत, विजयकुमार पलसे, रोहिणी कदम,किरण मसे, रत्नमाला राऊत, विश्वनाथ चव्हाण,पी.बी.हलरे, प्रविण म्हसे, मनोजकुमार शेरकर,अजय मोरे,पवन कोळी, किशोर ढेंगळे,अमित उंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.