धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज दि. 16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
भरणे यांचा पुणे–इंदापूर–धाराशिव हा सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता इंदापूर येथून कुर्डुवाडी, बार्शी, येरमाळा मार्गे वाशी (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील.
दुपारी साडेतीन वाजता वाशी येथे आगमन करून शहर व लगतच्या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी कृषिमंत्री करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार राहुल भैय्या मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सायं. साडेपाच वाजता भरणे वाशी येथून पुन्हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता तेथे पोहोचून मुक्काम करतील.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी भरणे यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- धाराशिव जिल्ह्यात महायुतीत समन्वय नाहीच! एकमेकांच्या मंत्र्यांच्या दौऱ्यात पाठ फिरवण्याकडे भर
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी
- फास्टॅग वार्षिक पास योजना देशभरात लागू; पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे करणार पाहणी
- ईटकुर येथील वाशीरा नदीला महापूर मुसळधार पावसात ऊस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान,नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी