ट्रकला धान्य आणण्याची परवानगी कोणी दिली?
ट्रक ड्रायव्हर प्यादा, खरे शिकारी बसतात पुरवठा विभागात!
आकाश नरोटे
(भाग ३)
धाराशिव – १४ फेब्रुवारी रोजी तेर येथे सरकारी योजनेचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार घडला होता. त्याला एक महिना पूर्ण झाला असला तरी त्यातील बडे मासे अद्याप सेफ असून वातानुकूलित आणि पंख्याचा हवेखाली निवांत बसलेले असतात.
दैनिक जनमत ने यापूर्वी याबाबत दोन भाग प्रसिद्ध केले असून हे प्रकरण ८.९४ क्विंटल तांदळाच्या अफरातफरीचे नसून यापेक्षा मोठा घोळ असून तो समोर येणे गरजेचे आहे.
पुरवठा विभागाने माध्यमात बातमी आल्यावर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र ट्रक ड्रायव्हर आणि त्याचा मालक या घोळाच्या साखळीचे प्यादे आहेत. आपली चोरी उघडी पडली तर ट्रक आणि आणि त्याचा मालक सहज अडकवू या नियोजनाने पुरवठा विभागातल्या बड्या माश्यांनी हा खेळ रचला आहे.
विशाल ट्रान्सपोर्टला शासकीय धान्य वाहतुकीचे कंत्राट मिळाले असून ज्या वाहनाद्वारे वाहतूक करायची आहे त्याची नोंद पुरवठा विभागात असते मात्र काही कारणास्तव वाहन बदलले तर त्याची वेगळी परवानगी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते मात्र गुन्हा दाखल झालेल्या ज्या वाहनातून वाहतूक केली गेली त्याची परवानगी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याची माहिती आहे. परवानगी असेलच तर पुरवठा विभागाने त्याचा खुलासा करणे अपेक्षित आहे. गेल्या महिनाभरात पुरवठा विभागाने आपला कारनामा उघडा पडू नये म्हणून प्रयत्न केले असले तरी अद्याप त्याला यश मिळालेले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार येण्यापूर्वी हा अफरातफरीचा प्रकार घडला असून त्यांना हा प्रकार माहितीच नाही. शासकीय धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असून याबाबत ते नेमकी कोणती पावले उचलतात हे पाहणे महत्वाचे आहे.
गोदामपालाच्या अहवालात काय?
अफरातफरीच्या प्रकरणात धाराशिव येथील गोदामपालाच्या अहवालावरून सहायक पुरवठा अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला मात्र तो अहवाल नेमका कसा आहे त्या काय म्हणलं आहे यासाठी तो मिळावा अशी मागणी पत्रकारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली मात्र तो अहवाल पब्लिक डॉक्युमेंट नाही म्हणत त्यांनी अहवाल देण्यास नकार दिल्याने त्या अहवालात नेमकं काय आहे याची उत्सुकता आहे.
- चौकशी समिती घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी की कारवाईसाठी?
- धाराशिव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणीचा गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- धाराशिव जिल्हा परिषद ‘100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत’ अव्वल; QCI पथकाकडून अंतिम मूल्यमापन
- केशेगाव स्मृती स्तंभ प्रकरणी लहू खंडागळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार,दप्तर दिरंगाईवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी; 28 फेब्रुवारीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
- ज्योती हनुमान पाटील यांची धाराशिवच्या अपर जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती