दहिफळ (योगराज पांचाळ)
कळंब तालुक्यातील दहिफळ- परतापूर रस्त्यावर रात्रीच्या अकराच्या सुमारास रेडीमेड कपड्यांची वाहतुक करणाऱ्या कंटेनरला आग अचानक आग लागली यामध्ये लाखोंचा माल जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोलापूरहून अंबाजोगाई कडे जाणारा कंटनेर दहिफळ परतापूर मार्गे कळंब कडे जात होता.बाभळगाव येथे ड्रायव्हरचे नातेवाईक होते जाता जाता भेटावे म्हणून या मार्गे रेडीमेड कपड्यांनी भरलेली गाडी रस्त्याने जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला गेली गाडी वर घेताना टायर गरम होऊन टायरने पेट घेतला.पत्रा गरम झाल्यामुळे आतील कपड्याला आग लागली.काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले गाडी पेटली.रात्रीची वेळ होती.जवळ वस्ती असल्यामुळे काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जवळ शेतात असलेले बोअर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आली नाही.
घटनेची माहिती मिळताच
वैभव काळे, तात्या भातलवंडे, मनोज गोरे,वैभव गायकवाड, गोपाळ शिंदे समाधान वाघमारे अतुल वाघमारे यांच्यासह
परतापुर दहिफळ बाभळगांव च्या २५-३० तरुणांनी तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात येण्याजोगी नसल्याचे लक्षात येताच तुषार वाघमारे यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक दलास पाचारण केले.
कळंब नगरपालीकेचे कर्मचारी महादेव हाजगुडे व गजानन जाधवर यांनी वेळीच धावून येत आग्निशामकच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.परंतू कपड्यांची राख रांगोळी झाली होती.लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.
गाडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी, सोलारपंप होते अग्नीशामक गाडी वेळीच आल्यामुळे मोठ्याप्रमाणात हानी टळली.
- दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- ८.९४ क्विंटलची अफरातफर नव्हे, तर जिल्हा पुरवठा विभागात सुमारे २०० कोटींचा घोटाळा?
- पंधरा वर्षानंतर पारा गावातून ऋषिकेश शेळके यांची भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड; जल्लोषात मिरवणूक काढत गावकऱ्यांचा आनंदोत्सव
- जिल्हा पुरवठा अधिकारीच तांदूळ अफरातफरीच्या सूत्रधार ?
- जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, आणि आर.टी.ओ.ची मिलीभगत? तांदूळ अफरातफरीत प्रशासनाची चुप्पी!