तासगाव – महाराष्ट्र शासन व प्रशासनाला साथ द्या व सुरक्षित रहा असे आवाहन आ. सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे संपूर्ण जगात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे आपल्या देशात सुद्धा या वायरस ची काही लोकांना लागन झाली आहे परंतु नागरिकांनी घाबरून न जाता याचा प्रसार होऊ नये त्यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे जर ताप,डोकेदुखी, सर्दी, घसा दुखणे, सततचा खोकला होत असेल तर तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन औषध घेणे आवश्यक आहे व्हायरसचा
प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी महाराष्टातील महा विकास आघाडीच्या सरकारने जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत त्यामध्येना गरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये धार्मिक स्थळे येथे गर्दी करू नये, गरज
नसताना प्रवास करू नये, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम सध्यातरी स्थगित ठेवावेत किंवा टाळावेत, त्याचप्रमाणे शासनाने शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर केले आहे.गर्दीचे ठिकाण असणारे मॉल व बजार बंद करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे लहान मुले व ज्येष्ठ वयस्कर मंडळी यांनी शक्यतो घरी थांबावे बाहेर पडू नये कोरोना आजार मला करून होईल ही भीती मनातून काढून टाकावी हे संकट राष्ट्रीय
आपत्ती आहे त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता व्यक्तिगत जबाबदारीचे भान ठेवावे व सदरच्या संकटावर मात करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.विषाणूची साथ आटोक्यात यावी यासाठी आपले महाराष्ट्र शासन व प्रशासन
सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे सर्व डॉक्टर्स रात्र- दिवस मेहनत करून देशसेवा करीत आहेत. त्यांना व पोलीस प्रशासनाला साथ देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तरी उद्या सर्वांनी घरी थांबून स्वतःबरोबर आपल्या कुटंबाची काळजी घ्यावी शिस्त
पाहताना आपल्या बरोबरच समाजाचा व देशाचा विचार करावा असे मी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून कळकळीचे आवाहन करीत आहे.’ असे आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहेआम