उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहराजवळ एका शेतकऱ्याच्या शेतात उल्कापात झाल्याचे चर्चा होत आहे. प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधावर आकाशातून एक दगड पडला असल्याचे सांगितले जात आहे.तो अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. यामुळे दीड इंच खोल खड्डा पडला. शेतात तुंबलेले पाणी काढत असताना माळी यांना विचित्र आवाज ऐकायला आला. त्यांच्यापासून सहा सात फुटावर असलेल्या बांधावरच एक दगड जोरात आदळला.तो सोनेरी गव्हाळ रंगाचा होता तसेच 7 इंच लांबी, तर सहा इंच रुंदी.3.5 इंचापेक्षा अधिक जाडीचा आणि साधारण अडीच किलो वजनाचा हा दगड आहे सध्या लोकांमध्ये उल्कापात झाल्याची चर्चा आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी उल्कापात असल्याचे नाकारले
हा प्रकार तहसीलदारांना कळवण्यात आला. त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना कळवले. मात्र वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर यांनी हा उल्कापात नसल्याचे सांगितले. वैज्ञानिक दृष्टया या घटनेची पुष्टी होत नाही. उल्कापाताची व्याप्ती मोठी असते एका ठिकाणी दगड पडल्याने त्याला उल्कापात म्हणता येत नाही. घटनस्थळी भेट देऊन याबाबत अधिक माहिती सांगितली जाईल. नागरिकांनी घाबरु नये असे वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर यांनी आवाहन केले आहे.