येडशी – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील रेल्वे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, वाहनचालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनातील तब्बल ९० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ही घटना गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी बाकर आयुब (रा. चोदपूर, ता. पुखरायान, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) हा आपले युपी ७७ बीएन ३२१३ क्रमांकाचे वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. येडशीजवळील एनएच ५२ वरील रेल्वे ब्रिजवर त्याने समोरील ट्रेलर (क्र. केए ४१ डी ७०७३) व कंटेनर (क्र. केए ४१ डी ६६४५) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात वाहनातील सोनवीर राम सनेही (रा. बिछौली, पोस्ट ऐतहार, जि. भिंड, मध्य प्रदेश) गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. तर फिर्यादी अरशद इस्तीखार (वय १९, रा. चांदोपुर, पोस्ट अमरोधा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश – व्यवसाय: क्लिनर) आणि चालक बाकर आयुब हे जखमी झाले.
धडकेनंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या ७१ शेळ्या व १९ मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे जनावरांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी अरशद इस्तीखार यांनी १० ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
