Home Blog Page 315

सुरेश पाटलांना मिळणार राष्ट्रवादीची उमेदवारी?

 उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसची उस्मानाबाद- कळंब जागेची उमेदवारी एस.पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ई.डी. ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस-आरपीआय आघाडीचा गमजा घातला होता. सुरेश पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून मोजकेच दिवस झाले आहेत.   त्यांच्याकडे आघाडीच्या प्रचाराचा गमजा दिसल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल मुंबईत इच्छुक उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मुंबईहून येताना सुरेश पाटील प्रचार साहीत्य घेऊन आल्याचे बोलले जात आहे.मात्र अद्याप पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

पार्टनरशिप मध्ये फार्मसी चालू करण्याच्या नावाखाली 50 लाखाची फसवणूक

सोलापूर,दि. २६ (प्रतिनिधी) आंध्रप्रदेशातील
हॉस्पिटलमध्ये औषध पुरविण्याची संधी आली असून
आपण दोघे पार्टनरशिपद्वारे फार्मसी उघडून या
ठिकाणी आपण बिजनेस करू असे सांगून फिर्यादी
कडून वेळोवेळी पन्नास लाख रुपये घेऊन फार्मसी
चालू करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची
घटना समोर आली आहे.

याप्रकरणी विजयवाडा आंध्र प्रदेश येथील
नात्यातील दोघा व्यक्तींविरुद्ध सदर बाजार पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत आयप्पा
कोत्ता (वय ३४ राहणार रूची नगर जुळे सोला-
पूर) यांनी फिर्याद दिली असून व्यंकट संत्यनारायण
कोत्ता व वीर वेंकटा गिरीनाथ कोत्ता (दोघे राहणार
विजयवाडा आंध्रप्रदेश) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे
 दाखल झाले. यातील फिर्यादी हे गेल्या दहा वर्षापासून
 सोलापुरात एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून
काम करत आहे. तर आरोपी हे आंध्रप्रदेश येथील
फिर्यादी यांचे नातेवाईक आहे.वरील आरोपींनी सन
२०१५ ते २०१७ या कालावधीत आंध्रप्रदेश येथील
हॉस्पिटलमध्ये औषध पुरवण्याच्या नावाखाली चंद्रा

फार्मसी ही औषध कंपनी भागीदारीमध्ये उघडून
यातून वर्षाला दहा लाख रुपये नफा मिळण्याचे
आमिष दाखवून फिर्यादी कडून वेळोवेळी रोख रक्कम
घेतली. मात्र फिर्यादीने दिलेली रक्कम व्यवसायासाठी
न वापरता स्वतःकडे ठेवून फिर्यादीची फसवणूक
केली. व फिर्यादीने दिलेली ५० लाखाची रक्कम परत
मागितले असता आरोपीने फिर्यादीस दमदाटी करून
पैसे मागितल्यास तुझ्या आई-वडिलांना खलास
करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फार्मसी उघडण्याच्या नावाखाली वेळोवेळी विश्वास
संपादन करून पन्नास लाख रुपये घेऊन नात्यातील
दोघा व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे सांगत सदर
बाजार पोलीस ठाण्यात विजयवाडा आंध्रप्रदेश येथील
दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास
पोलीस सब इन्स्पेक्टर शेख करत आहे.

लहान बालकांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी*. *डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने*

लहान बालकांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी- डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने
 उस्मानाबाद-

डॉ.सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्या वतीने,  बालक व किशोरवयीन मुलांमुलींसाठी ‘नकोसा स्पर्श’ (गुड टच बँड टच) या विषयाचे प्रबोधन करण्यासाठी तुरोरी ता उमरगा येथील श्री. ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे  कार्यक्रम घेण्यात आला.

उमरगा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. चांगला ‘स्पर्श व वाईट स्पर्श’ या विषयावर सर्व समाजात अधिक मंथन  व जागृती निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच लहान मुलांना असुरक्षित वाटत असल्यास त्यांनी पालक, शिक्षक, पोलीस किंवा चाइल्ड लाईन संस्थेच्या ‘1098’ या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले. 
 सह्याद्री फाऊंडेशन्स च्या सचिव व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध शाळेत अशा  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान  प्राचार्य एस.वाय.जाधव यांनी भुषविले.प्रास्ताविक व सुत्रसंचालन जी.बी.दुधभाते तर आभार सह्याद्री फाऊंडेशन्सचे समन्वयक राजेंद्र कापसे यांनी मानले. यावेळी शिक्षक श्रीमती एस.ए.शिंदे, के.ए.शिंदे, एस.एस.तिर्थकर, पालक, कर्मचारी, इ.मान्यवर उपस्थित होते

शालेय पोषण आहारात मृत पाल , ग्रामस्थांचा शाळेत ठिय्या!

शाळेच्या तक्रारीचा ग्रामस्थांनी वाच पाढा , मोठा अनर्थ टळला!

उमरगा दि . २५ प्रतिनीधी : उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील शालेय पोषण आहारातील दुपारच्या जेवणात पाल  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली  असून विद्यार्थी व ग्रामस्थांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . ही  घटना मंगळवारी  दि.२४ रोजी घडली. 
          उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास २६४  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे मध्यान्ह भोजन दिले जाते . मंगळवारी शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले असता शाळेतील इयत्ता ४ थीत शिकणाऱ्या तृप्ती किशोर वाडीकर या विद्यार्थ्यांनीने दिलेलाभात  शाळा सुटल्यानंतर  घरी घेवून गेला. घरात  तिने डब्बा उघडून पाहिल्यानंतर तीला डब्ब्यात पाल आढळून आली . तीने तीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब आनुन दिले ,तीच्या पालकांनी सदर घटनेची माहीती मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाला भ्रमणध्वनी वरुन दिली .
              बुधवारी दि.२५ रोजी मध्यान्ह भोजन शालेय पोषण आहार  अधिक्षक व्ही.जी राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येवून पंचनामा केला. शाळेतील होणाऱ्या गंभीर घटनेच्या ग्रामस्थामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गावातील पालकांनी शाळेत ठिय्या मांडला  तसेच संतप्त पालकांनी मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ग्रामस्थांनी शाळेतील इतर अडचणीचनी बाबतीत ही आक्षेप घेतला तसेच मुख्याध्यापकाच्या  बदलीसाठी गावातील लोकांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे . सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन भात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे . कुठल्याच विद्याार्थ्याना त्रास झाल्याची तक्रार नाही यामुुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा ग्रामस्थातुन होती .
         यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विकास पाटिल , सरपंच रविंद्र हंगरगे , चेअरमन भीमराव पाटिल , प्रविण जाधव , शिवाजी सुरवसे , गोरख तेलंग , हरीदास सुरवसे , प्रभाकर बिराजदार , विठ्ठल कुर्लेकर , सुग्रीव वाडीकर , संतराम काळे ,  शिवाजी बिराजदार , गणपती मिरगाळे , विष्णू बिराजदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
———–
शालेय पोषण आहार इतर विद्यार्थी व शिक्षकांनीही खाल्लेला असुन त्यांना कोणतीही विषबाधा किंवा त्रास झालेला नाही .  घरी घेवुन गेलेल्या डब्यात पाल आढळली आहे . पुढील योग्य ती कार्यवाही सुरू आहे -_बिराजदार एस.व्ही. ( विस्तार अधिकारी पं .स. शिक्षण )

राणा दादांसाठी कार्यकर्त्यांच्या भावनिक पोस्ट

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागत असतानाच राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. सतिश दंडनाईक, स्वानंद पाटील, मनगोत शिनगारे या पाटील समर्थकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे हे भावनिक आवाहन
आजपासून मोजून ३० दिवस बाकी आहेत मित्रांनो, भावांनो…
दादांची ही निवडणूक आहे, याआधी जे काही केलंय त्याबद्दल दुमत कोणाचे असण्याचं कारण नाहीच पण यावेळी जे काही करायचे आहे ते महत्वाचे आहे,  आणि ती वेळ आताच आहे, आणि हीच आहे…
जो आपल्यासाठी राबतो.. जो आपल्यासाठी धडपडतो.. जो आपल्यासाठी लढतो.. दरवेळी आपल्या हाकेला धाऊन येतो.. त्या माणसाला या निवडणुकीत आधार देण्याची ही खरी वेळ आहे..
आपल्यासाठी तो माणूस झिजलाय.. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन आपल्या संकटात आपल्यासाठी वेळोवेळी धावलाय.. त्या माणसाला आज तुमच्या – माझ्या साथीची गरज आहे, आधाराची गरज आहे.. त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठबळ देणं हे आता आपलं आद्यकर्तव्य आहे…
आजच एक वज्रनिर्धार करूयात… आपण आपल्या आयुष्यातील हे ३० दिवस दादांसाठी देऊयात..
एकसंघ, एकविचार आणि एकदिलानं लढूयात मतभेद- मनभेद असतील अथवा नसतील त्या साऱ्यांच्या या ३० दिवसात गाशा गुंडाळून ठेऊया आणि हा उस्मानाबादचा बुरुज दादांसाठी भक्कम बाहुत देत अधिक बळकट करूया, अभेद्य ठेवूया..
ही  दादांसाठी वेळ आहे आता कमी पडलात तर कधीच ही वेळ भरून निघणार नाही.. आणि आपल्याला येणाऱ्या पिढ्या, वेळ, काळ कधीही माफ करणार नाही..
साथ द्या..
आपल्या माणसाला..
आपल्या हक्काच्या माणसाला..

कोल्हापूर जिल्ह्यात झाला रक्ताचा तुटवडा, रक्तसंकल नच थंडावले


महापुरामुळे बसला फटका डेंग्यू सह अन्य रुग्णांची ससेहोलपट, रक्‍तासाठी नातेवाईकांची होते धावपळ…

निकीती निकम:- पाचगाव
       महापुरामुळे गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदान शिबिरच न झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तपेढीत रक्ताचा ठणठणाट झाल्‍याने रुग्णालयातून मागणी झाली तर रक्त द्यायचे कोठून असा पेच आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने डेंग्‍युसह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने रक्ताविना रुग्णांची ससेहोलपट होत आहे.
             कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या मोठी आहे सण,समारंभ, वाढदिवसापासून ,निमित्त मिळेल त्यावेळी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.  एखादी आपत्ती आली तरी मदतीसाठी सर्वात पुढे कोल्हापूर करच असतात .त्यामुळे कोल्हापूरकरांची रक्ताची गरज भागवून इतर जिल्ह्यांना रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो .पण  महापुरामुळे रक्तदान शिबिरे होऊअपेक्षीत अशी होऊ शकलेली नाहीत .महापुराच्‍या कालावधीत आठ-दहा दिवस सगळेच व्यवहार ठप्प होते
             ऑगस्ट महिन्यात वर्षभरातील उच्चांकी रक्त संकलन होते १५ ऑगस्टला तर बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते पण यंदा ते होऊ शकले नाही त्याचा परिणामही रक्तसंकलनावर झाला आहे महापूर ओसरल्याने सगळीकडे दुर्गंधी, घाण पहावयास मिळत आहे घाणीमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालय तुडुंब झालेली दिसतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे त्यांना बाहेरून रक्त व रक्त घटकांची गरज लागते पण रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाटअसल्याने त्यांना वेळेत रक्तपुरवठा होत नाही……
          चौकट
प्‍लेटलेटस्‌ची मागणी जास्‍त वाढली ..
         डेंग्‍युमूळे रोज ४० हून अधिक रक्त पिशव्यांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे यामध्‍ये प्‍लेटलेटस्‌ची मागणी अधिक आहे विशेष म्हणजे प्‍लेटलेटस्‌चे आयुष्य केवळ पाच दिवस असल्याने त्यांची साठवणूक करता येत ना…
       *ही रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे…
 रक्‍ताची गरज आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे .त्यामुळे रुग्णांसाठी रक्तदात्यांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन ऐच्‍छीक रक्तदान करावे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था ,तरुण मंडळांनी, स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजूंना रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावावा…
         –  स्‍वराज्‍य मित्र मंडळ कोल्‍हापूर. 
  अध्‍यक्ष :-अभिजीत पोवार

खा.ओमराजे धर्मसंकटात?

उस्मानाबाद – विधानसभेची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागणार आहे. तत्पूर्वीच जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रोमांचक लढाई उस्मानाबाद- कळंब मतदार संघात होईल असा चंग बांधला जात आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत ‘सबका साथ सबका विकास’ अशी आरोळी उठवत भाजपचा झेंडा हाती घेतला. पाटील यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचे पारंपरिक विरोधक खा. ओमराजे यांनि कडाडून विरोध केला. भाजप- शिवसेना युतीत उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र पाटील यांनी प्रवेश करताना तो भाजपकडे राहील आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची चाचपणी केली होती. भाजपनेही उस्मानाबाद मतदारसंघ आपल्याकडे रहाण्यासाठी जोरदार तयारी  केली आहे. पाटील यांना उमेदवारी दिल्यास ओमराजे त्यांचा प्रचार करतील की नाही  असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडत आहे. उस्मानाबाद -कळंब मतदार संघात ओमराजे यांचा संपर्क दांडगा आहे. राणा पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात उमेदवारी दिल्यासही उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे मतदारसंघात आहेत तेथेही ओमराजेंचा संपर्क चांगला आहे. पाटील विरोधातील गट सतत त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी पाटील यांचा  प्रचार न केल्यास फटका बसू शकतो याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने तन-मन लावून ओमराजेंचा प्रचार केला आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी औसा येथे सभा घेतली होती. लोकसभेच्या सबंध प्रचारात ओमराजे  यांनी भाजप सरकराचे तोंडभरून कौतुक केले होते. भविष्यात केंद्रातील योजनांसाठी त्यांना भाजपची साथ लागणार आहे. पाटील यांचा प्रचार करावा की नाही, विरोध केला तर मित्र पक्षाला फटका बसू शकतो. भविष्यात भाजप कितपत मदत करेल याची शाश्वती नाही हे धर्मसंकट ओमराजेंपुढे उभे टाकले असल्याची चर्चा आहे.
आकाश नरोटे 
दैनिक जनमत
८४२१५३१९७६