धाराशिव दि. 20 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या मालमत्तेच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, तब्बल साडेचार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
ढोकी पोलीस ठाण्यातील घटना :
फिर्यादी मंगेश भारत मुळे (वय 32, रा. तांबरी विभाग धाराशिव) यांच्या किणी येथील शेतामधील वरद विनायक ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. च्या वेअरहाऊस शेटरमधील 70 हरभऱ्याचे कट्टे, अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा माल दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते दि. 17 ऑगस्ट सकाळी 9.15 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी ढोकी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 305(ए), 334(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाण्यातील घटना:
फिर्यादी बिभीषण पांडुरंग कोल्हे (वय 38, रा. हावरगाव ता. कळंब) यांच्या शेत गट नं. 139 व 145 मधून तसेच इतर 11 शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर, मोटार असे मिळून 53 हजार 80 रुपयांचे साहित्य दि. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या घटनेवरून कळंब पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ढोकी पोलीस ठाण्यातील घटना :
फिर्यादी प्रियांका दत्तात्रय ढवरे (वय 30, रा. दाउतपूर, ह.मु. समता नगर धाराशिव) या माहेरी कोळेकरवाडी येथे वास्तव्याला असताना दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 या वेळेत घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने (94 ग्रॅम) व रोख 3 हजार रुपये, असा मिळून 2 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणीही ढोकी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 305(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या तिन्ही घटनांनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला आहे.