मुंबई, 20 ऑगस्ट 2025: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून ते नव्या कायद्यापर्यंत आणि मुंबईतील पूरपरिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारची पोलखोल केली. राऊत म्हणाले की, मोदी सरकार विरोधी पक्षांना दाबण्यासाठी नवे कायदे आणत आहे, तर महाराष्ट्रातील पूरासाठी राज्य सरकार जबाबदार आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीवरून बहुमताचा मुद्दा
राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे बहुमत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “आज तरी इंडिया आघाडीकडे बहुमताचा आकडा आहे. पण केंद्र सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन करून समर्थन मागितले, याचा अर्थ त्यांचे बहुमत अस्थिर आहे.” त्यांनी भाजपचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका करत म्हटले की, ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीने राजभवनात अटक केली, जे घटनाबाह्य आहे.
इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टचे माजी न्यायमूर्ती आणि हायकोर्टचे माजी मुख्य न्यायमूर्ती आहेत. ते देशातील समस्यांवर नेहमी बोलतात. आज सेंट्रल हॉलमध्ये इंडिया ब्लॉकचे सर्व खासदार त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि उद्या 21 ऑगस्टला नामांकन दाखल करणार आहोत.” त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना आवाहन करत म्हटले की, मोदी-शहांच्या दबावाशिवाय रेड्डींना समर्थन द्या.
नव्या कायद्यावर हल्लाबोल
राऊत यांनी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून येणाऱ्या नव्या कायद्यावर टीका केली. ते म्हणाले, “घटनेच्या कलम 45 मध्ये बदल करून, अटक झालेल्या मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला 30 दिवसांत राजीनामा द्यावा लागेल असा कायदा आणला जात आहे. हा कायदा विरोधी पक्षांच्या सरकारांना दहशत निर्माण करण्यासाठी आहे.” त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, संजय राठोड, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे असल्याचे सांगत म्हटले, “तुमच्या सरकारचे मंत्री धुतलेल्या आंधळ्यासारखे आहेत. अमित शहा, संजय शिरसाट यांना तुरुंगात टाका आणि बरखास्त करा.”
राऊत पुढे म्हणाले, “हा कायदा विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी आहे. राहुल गांधींनी मतचोरीवरून निवडणूक आयोगाविरुद्ध वणवा पेटवला, त्यामुळे आता राज्यांत विरोधी सरकारे येणार आणि त्यांना पक्षांतर करून भाजपमध्ये आणण्यासाठी हा कायदा आहे. हुकुमशाहीची शिखर आहे.” त्यांनी पंतप्रधान मोदींवरही आरोप करत म्हटले, “पंतप्रधानांवर देश लुटल्याचा आरोप आहे, त्यांना अटक करा.”
मुंबई पूर आणि सरकारची अपयश
मुंबईतील कालच्या मुसळधार पावसावर बोलताना राऊत म्हणाले, “मुंबई ठाणा संपूर्ण बंद झाले, राज्य सरकार हतबल झाले. काल अमित शहांसमोर मी हा मुद्दा उपस्थित केला. मुंबईसारखे शहर पाण्यात गेले, मराठवाड्यात लष्कर बोलवावे लागले, वायनाडात 65 लोक मृत्यूमुखी पडले. सरकारची यंत्रणा अपघातानंतर जाते, पण अपघात टाळण्यासाठी काय करतात?”
त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत म्हटले, “मुंबई महानगरपालिकेला तीन वर्षांपासून नेतृत्व नाही, भ्रष्टाचार वाढला. देवेंद्र फडणवीस छत्री घेऊन फिरत होते, शेंगदाणे खात फिरत होते. मोनोरेल बंद पडली, लोक अडकले. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहांचा पाठिंबा आहे.” अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले, “अजित पवार मोठे तज्ञ आहेत, पण मोनोरेलमध्ये जास्त लोक घुसले असतील तर त्यांची यंत्रणा काय करत होती?”
एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, “शिंदे छत्री घेऊन कॅमेरे घेऊन फिरत होते. मुंबई बुडाली तेव्हा ते बुडणारे भाग बघायला गेले.” ठाकरे गटावर टीकेच्या उत्तरात ते म्हणाले, “काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यंत्रणा राबवत होते. ठाकरेंचा संबंध काय? सरकार शिंदे-फडणवीस-पवारांचे आहे.”
- महाराष्ट्रात गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार,उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी तालुका ते राज्य स्तरावर स्पर्धा, १.५० कोटींची पारितोषिके
- उपराष्ट्रपती निवडणूक 2025: “बहुमत असताना विरोधकांना फोन का?” संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात – सोमनाथ गुरव यांची माहिती
- “धाराशिव जिल्ह्यात रेखाकला परीक्षेला चित्रकलेचे गुरुजीच नाहीत; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान”
- धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर; तर काही मंडळांमध्ये चिंताजनक कमतरता