भारतीय कृषी विमा कंपनीचे अपील फेटाळले – शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश

0
30

मुंबई: खरीप हंगाम 2022 संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत आज मंत्रालयात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात केलेले अपील समितीने फेटाळले आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने भारतीय कृषी विमा कंपनीला आदेश दिले की, शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे द्यावेत आणि पंचनाम्यातील अहवालानुसार नुकसानभरपाई अदा करावी. तसेच, पूर्वसूचना दिलेल्या भागांचे सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी कंपनीवर टाकण्यात आली. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव (कृषी) श्री. विकास रस्तोगी होते. तसेच, अवर सचिव सरिता पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे आणि श्री. माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के, कृषी आयुक्त आणि सांख्यिकी विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here