मुंबई: खरीप हंगाम 2022 संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत आज मंत्रालयात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात केलेले अपील समितीने फेटाळले आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने भारतीय कृषी विमा कंपनीला आदेश दिले की, शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे द्यावेत आणि पंचनाम्यातील अहवालानुसार नुकसानभरपाई अदा करावी. तसेच, पूर्वसूचना दिलेल्या भागांचे सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी कंपनीवर टाकण्यात आली. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव (कृषी) श्री. विकास रस्तोगी होते. तसेच, अवर सचिव सरिता पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे आणि श्री. माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के, कृषी आयुक्त आणि सांख्यिकी विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
- 5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?
- जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार ! मार्चमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आदेश, कर्मचारी उपस्थित – विभाग प्रमुख मात्र गायब!!
- धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका – जिल्हा आणि राज्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष