धाराशिव – लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पहिला अर्ज भूम च्या आर्यनराजे शिंदे यांनी घेतला आहे.
राष्ट्रीय समाज दल (आर) या पक्षाच्या वतीने त्यांनी हा अर्ज घेतला असून ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या तासात सहा अर्जांची विक्री झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी संख्या वाढू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त असून गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीसोबत मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.
- निकृष्ट बियाणे, खते व कीटकनाशकांवरील तक्रारींवर तात्काळ कारवाईसाठी सरकारकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना
- विठुनामाच्या गजरात भूम नगरीत आषाढी पालखीचे जल्लोषात स्वागत
- मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची RPI (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- दारूच्या नशेत शिक्षक शाळेत हजर; चिंचपूर (बु) ग्रामस्थांत संताप, शिक्षण खात्याकडे तक्रार,
- धाराशिव पोलिसांची मोठी कामगिरी : १७ गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ अखेर गजाआड