दिल्लीवारी झाली तरी महायुतीचा पैलवान ठरेना, खा. राजेनिंबाळकरांचा गावभेटीवर भर

0
90

धाराशिव – ७ मे रोजी उस्मानाबाद लोकसभेसाठी मतदान होणार आहे मात्र अद्यापही महायुती आणि इतर पक्षातील उमेदवार जाहीर होत नसल्याने लोकसभेच्या आखाड्यात कोणते पैलवान उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर गावभेट दौरा करत आहेत.
महायुतीतील विशेषतः शिवसेनेतील काही नेते दिल्ली येथे तळ ठोकून होते तिथे काही नेत्यांशी गाठीभेटी त्यांनी घेतल्या आज ते मुंबईत आहेत मात्र त्यांना तिकीट न देण्यावर भाजप ठाम आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यातील नेमका तपशील समोर आला नसला तरी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी तिकीट आजच फायनल होईल असे विश्वासाने सांगत होते. तर भाजपचे काही पदाधिकारी दिल्लीत असल्याची चर्चा होती मात्र एका महत्वाच्या नेत्याने त्याला दुजोरा दिला नाही. राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांना देखील महायुती कडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे ते देखील मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
तर बसपा सह इतर पक्षांनी देखील आपली आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे मात्र त्यांचे देखील उमेदवार न ठरल्याने लढत कशी होणार हे अस्पष्टच आहे.

असा मध्यमार्ग निघण्याची शक्यता

भाजप उस्मानाबाद लोकसभेचा दावा सोडण्यास तयार नाही त्यात ही जागा आमची आहे उमेदवार आमचाच असेल असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे मात्र शिवसेना देईल तोच उमेदवार मात्र भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा मध्यममार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तग धरण्यासाठी मुंबईच
खासदार झाल्यास दिल्लीतील राजकारणात जावे लागते परिणामी भविष्यातील मंत्रिपद, पालकमंत्रिपद जाते. त्यामुळेच पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील हे स्वतः निवडणूक लढवण्यास तयार नाहीत मात्र महायुतीच्या नेत्यांकडून दोघांपैकी एक उमेदवार प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकतो असा विश्वास असल्याने त्यांनाच ही निवडणूक लढविण्याची गळ घातली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here