रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना जात विचारण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडत असून त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी असे प्रकार थांबवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाऊ नये.मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तत्काळ थांबवावेत, ताबडतोब निर्देश द्यावेत अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खतखरेदी करण्यासाठीही जात सांगणं अलिकडे बंधनकारक केलं होतं. त्यावेळीही भविष्यात असे प्रकार थांबवण्याचा आम्ही सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर सुद्धा हा प्रकार घडला आहे. असं अजित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर म्हटले आहे.
#Ajit_pawar #Ajitpawarplatestnews
#NCP