वडापाव अनेकांसाठी भूक भागवण्यासाठीचा पदार्थ तर आहेच सोबत तो अनेकांना रोजगार देखील देत असतो. महाराष्ट्रामध्ये एकही असे शहर सापडणार नाही जिथे वडापाव मिळत नाही. वडापाव विकून अनेकजण श्रीमंत देखील झाले आहेत. तरुण तरुणी असतील किंवा अबालवृद्ध अनेकांना हा पदार्थ आवडतोच. वडापाव हा काही प्राचीन काळापासून महाराष्ट्रात आहे असं नाही त्याचा शोध महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या पदार्थाचा शोध लागला आहे मात्र या वडापावचा शोध नेमका कोणी लावला हे अनेकांना माहिती नाही. दादरच्या अशोक वैद्य यांना 1966 मध्ये दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडा पाव स्टॉल सुरू करण्याचे श्रेय दिले जाते.मुंबईच्या पूर्वीच्या मिल-हार्टलँडमध्ये झाला होता. दादरच्या अशोक वैद्य यांना 1966 मध्ये दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडा पाव स्टॉल सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. कामगारांना भूक भागविण्यासाठी तात्काळ उपलब्ध होणारा हा पदार्थ पुढे महाराष्ट्राची, मुंबईची ओळख झाला.