उस्मानाबाद – मुद्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून या संपामुळे नागरिकांची हेळसांड झालेली पाहायला मिळाली. गेले अनेक दिवस मुद्रांक विक्रेते विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी आज संपाचा निर्णय घेतला.अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक व नोंदणी पुणे येथे ७ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चामध्ये दिलेल्या अश्वासनानुसार संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे २१ सप्टेंबर पासून संघटनेकडून बेमुदत संप करण्याकरीता महाराष्ट्र मधील सर्व शासनमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्त लेखक संघटनेणे संप पुकारला आहे. त्याला उस्मानाबाद येथील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.