धाराशिव – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे गाव असलेल्या तेर मधून भाजपाच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. तेर पंचायत समिती गणातून भाजपच्या चिन्हावर उमेदवार होता मात्र त्याला माघार घ्यावी लागली असल्याने पंचायत समितीसाठी ईव्हीएम वर कमळ नसणार आहे. सुरेखा बाळासाहेब कदम यांना भाजपकडून ए फॉर्म देण्यात आला होता तर तनुजा अजित कदम यांना बी फॉर्म देण्यात आला होता मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने तेर पंचायत समिती गणातून भाजपचा उमेदवार नाही.
तेर पंचायत समिती गणात भाजपला आता अपक्षाला संधी द्यावी लागणार असून सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या भाजपकडे तेर पंचायत समिती गणात उमेदवार नसणे ही मोठी नामुष्की आहे. हजारो कार्यकर्ते लढण्यासाठी तयार असताना एका गणात राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची वेळ येत असेल तर हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे.
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
- प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश
- भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित
- “ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक
- भूम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात
