धाराशिव (Aakashh Natote)- जिल्ह्यात निवडणुका म्हणलं की राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होते. मात्र राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भाजपा आता पाटीलमय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने पाटील परिवार समर्थकांनी त्यांच्या अनॉफिशियल सोशल मीडियावर माऊली होणार जिल्हा परिषद अध्यक्ष अश्या पोस्ट टाकून नवा ट्रेंड सुरू केला हाच ट्रेंड इमानेइतबारे तळागाळापर्यंत काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. लोकसभेला पाटील कुटुंबियांसाठी काम केले, विधानसभेला पुन्हा पाटील कुटुंबियांसाठी काम केले आणि आता जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याच साठी काम करावे लागेल का? भाजप नवख्या आणि काम करणाऱ्यांना संधी आहे की नाही या विचाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी दावेदार?
माऊली ही बिरुदावली अर्चना पाटील यांना त्यांचे समर्थक वापरतात. सर्वसाधारण महिला यासाठी अध्यक्षपद असल्याने त्या अध्यक्ष व्हाव्यात अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. आता त्यांना अध्यक्षपदी बसविण्याचे स्वप्न पाटील परिवार समर्थक पाहत आहेत.
अर्चना पाटील नेमक्या कुठे?
अर्चना पाटील यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. भाजपच्या राजकीय मंचावर देखील त्यांना त्यानंतर फारसे पाहिले गेले नसल्याने त्या नेमके कोणत्या पक्षात आहेत हे स्पष्ट नाही
घराणेशाही चा आरोप
पाटील कुटुंबीयांवर त्यांचे विरोधक घराणेशाहीचा आरोप करतात लोकसभेला त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट दिल्याने त्या आरोपांना अधिकच धार मिळाली मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिले आणि अध्यक्षपदावर दावा केला तर भाजप घराणेशाहीला बळ देते या आरोपावर शिक्कामोर्तब होणार आहे.
- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा
- १५ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण: आरोपी अटकेत, पीडितेची सुखरूप सुटका
- माऊलीच्या ट्रेंड ने भाजपमध्ये अस्वस्थता!
- मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी
- हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद