धाराशिव :
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची तब्बल १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव सी., ता. व जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी विवाहाचे आमिष दाखवून त्यांचा खोटा विवाह लावून दिला. या विवाहाच्या नावाखाली फिर्यादीकडून एकूण रु. १,२०,००० इतकी रक्कम घेतली. मात्र नंतर हा विवाह फसवा व बनावट असल्याचे उघड झाले.
ही घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वडगाव सी. परिसरात घडली.
या गुन्ह्यात आरोपी म्हणून –
- युवराज पाटील, दशरथ्ज्ञ जहागीरदार (दोघे रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा),
- शांताबाई (रा. बैलबाजार, भारत पेट्रोल पंपाजवळ, कराड),
- अविनाश मिलींद साळवे (रा. गणेश नगर, वडाळा ईस्ट, मुंबई, मुळ रा. देवळी, ता. मानगाव, जि. सातारा)
- व त्याची पत्नी दिपाली अविनाश साळवे (रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा)
यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
