खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची १.२० लाखांची फसवणूक

0
146

धाराशिव :
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची तब्बल १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव सी., ता. व जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी विवाहाचे आमिष दाखवून त्यांचा खोटा विवाह लावून दिला. या विवाहाच्या नावाखाली फिर्यादीकडून एकूण रु. १,२०,००० इतकी रक्कम घेतली. मात्र नंतर हा विवाह फसवा व बनावट असल्याचे उघड झाले.

ही घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वडगाव सी. परिसरात घडली.

या गुन्ह्यात आरोपी म्हणून –

  • युवराज पाटील, दशरथ्ज्ञ जहागीरदार (दोघे रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा),
  • शांताबाई (रा. बैलबाजार, भारत पेट्रोल पंपाजवळ, कराड),
  • अविनाश मिलींद साळवे (रा. गणेश नगर, वडाळा ईस्ट, मुंबई, मुळ रा. देवळी, ता. मानगाव, जि. सातारा)
  • व त्याची पत्नी दिपाली अविनाश साळवे (रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा)

यांचा समावेश आहे.

फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here