कळंब (जि. धाराशिव) : कळंब शहरातील मयुर साडी सेंटर येथे दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय 39, रा. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (रा. लातूर) यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.15 वा. ते 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वा. या कालावधीत बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशा धमक्या आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दुकानाच्या शटरवर पोस्टर लावून “दुकान उघडले तर सोडणार नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू” अशीही धमकी दिली गेली.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2), 189(2), 191(2), 190(2), 329(3), 351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
