कळंब (जि. धाराशिव) : कळंब शहरातील मयुर साडी सेंटर येथे दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय 39, रा. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (रा. लातूर) यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.15 वा. ते 30 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वा. या कालावधीत बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशा धमक्या आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दुकानाच्या शटरवर पोस्टर लावून “दुकान उघडले तर सोडणार नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू” अशीही धमकी दिली गेली.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2), 189(2), 191(2), 190(2), 329(3), 351(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील