नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या तरुण ग्रामपंचायत सदस्याने दिला राजीनामा

0
87

 



एकाच आठवड्यात देवळाली मध्ये दोन राजीनामे


उस्मानाबाद –

उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील ग्रामपंचायत सदस्य उमाजी गायकवाड यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा गावाचे सरपंच नरसिंह खुणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यात्वाचा राजीनामा देण्याचे कारण की गावामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे गावात अतिक्रमण रोखण्यास ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या उमाजी गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी गावातील होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न देखील केले होते त्या प्रयत्नाला यश न आल्याने अस्वस्थ होऊन त्यांनी ग्रामपंचायत सदस्यात्वाचा राजीनामा दिला. उमाजी गायकवाड पुणे जिल्ह्यात नोकरीला होते. गावात बदल करायचा या भूमिकेने ते राजकारणात आले होते. दरम्यान देवळाली गावच्या उपसरपंच शितल गायकवाड यांनी देखील अन्य कारणांसाठी आपल्या सदस्यात्वाचा राजीनामा गावाचे सरपंच नरसिंह खुने   यांच्याकडे सुपूर्द केला आहे यामुळे गावात यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here