उस्मानाबाद – कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. अगोदरच हाताला काम नाही त्यातच खाद्यतेलापासून पेट्रोल डिझेलपर्यंत सर्वकाही महागलं आहे काँग्रेस सेवादलाच्या वतीने गावोगावी जाऊन ग्रामस्थांबरोबर महागाई विषयी चर्चा करण्यात येत आहे उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथे काॅंग्रेस सेवादल यांची महागाई विषयी बैठक घेण्यात आली या बैठकीला ग्रामस्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या बैठकीला सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू,यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रशांत डिकले,सेवादल तालुकाध्यक्ष मेहराज शेख,तसेच जयसिंग सूर्यवंशी,वसंत देशमुख,निजाम शेख,जर्नाधन माने,सचिन माने,प्रमोद पाटील,सुशील माने,संतोष पानढवळे,खाजाभाई शेख, मेहबूब देशमुख,दादा भोसले,आण्णा घोडके,बापू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते