उस्मानाबाद – राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य बीज उत्पादक संघाची स्थापना केली आहे या संघाच्या अध्यक्षपदी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा बु येथील ॲड.अमोल रणदिवे यांची झाली आहे अमोल रणदिवे यांनी कमी वयात कार्याची ओळख निर्माण केली आहे .त्यांची अध्यक्षपदी निवड होताच गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ॲड. अमोल रणदिवे यांचा ग्रामपंचायत व राजे छत्रपती सांस्कृतिक क्रिडा मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावाचे सरपंच प्रशांत रणदिवे, हणूमंत गाढवे, धनंजय साठे,तात्याराम कुदळे, सुधाकर देवगिरे,दादा गाढवे,बापू कासार,विकी रणदिवे, जितेंद्र रणदिवे,सचिन देवगिरे, नामदेव खरे,दिपक रणदिवे, अविनाश रणदिवे, बालाजी देवगिरे, पांडूरंग रणदिवे,बालाजी कापसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.