वाढीव मदत देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

0
114

उस्मानाबाद –

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे या पावसामुळे हाताशी आलेले पिक सततच्या पावसामुळे हातुन वाया गेले आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानचे भान ठेवून शासनाने जाहीर केलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे.
तरी शासनाने या मध्ये वाढ करुन जिरायत शेतीसाठी हेक्टरी ६० हजार रुपये तर फळ बागायत साठी हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्यात यावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिवनराव गोरे  , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष  सुरेश दाजी बिराजदार  , युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर , जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धायगुडे, अमित शिंदे , राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा  मंजुषा ताई मगर , नितीन बागल , प्रदीप घोणे , राष्ट्रवादी तुळजापूर तालुका महिला अध्यक्षा सौ. पवार  , दिनकर पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here