रस्ता अपघातात चालकासह दोघे जखमी, एकाचा मृत्यू – ९० जनावरे मृत

0
150

येडशी – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील रेल्वे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, वाहनचालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनातील तब्बल ९० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ही घटना गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी बाकर आयुब (रा. चोदपूर, ता. पुखरायान, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) हा आपले युपी ७७ बीएन ३२१३ क्रमांकाचे वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. येडशीजवळील एनएच ५२ वरील रेल्वे ब्रिजवर त्याने समोरील ट्रेलर (क्र. केए ४१ डी ७०७३) व कंटेनर (क्र. केए ४१ डी ६६४५) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात वाहनातील सोनवीर राम सनेही (रा. बिछौली, पोस्ट ऐतहार, जि. भिंड, मध्य प्रदेश) गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. तर फिर्यादी अरशद इस्तीखार (वय १९, रा. चांदोपुर, पोस्ट अमरोधा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश – व्यवसाय: क्लिनर) आणि चालक बाकर आयुब हे जखमी झाले.

धडकेनंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या ७१ शेळ्या व १९ मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे जनावरांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी अरशद इस्तीखार यांनी १० ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here