धाराशिव
केशेगाव (ता. धाराशिव) येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते लहु रामा खंडागळे यांनी धाराशिव जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात लेखी तक्रार सादर करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की, महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना मोबाईलवरून नियमबाह्य पद्धतीने चौकशीसाठी बोलावण्यात आले, तसे पत्र पोलिस प्रशासनाने त्यांच्या व्हॉट्स ॲप वरती पाठवले.ज्यामुळे त्यांचा मानसिक छळ झाला.
खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, दिनांक १७ मार्च २०२३ रोजी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक रिपोर्ट पाठवणे गरजेचे होते, मात्र तो मुद्दाम टाळण्यात आला. त्या संदर्भात त्यांनी तक्रार केली आहे. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने
लहू खंडागळे यांना अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून, यामागे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आणि चौकशीतील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“जर मोबाईलवरून नोटीस देणे कायदेशीर मानले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनीही मोबाईलवरूनच तक्रारी देणे आणि पोलीसांकडून स्वीकारणे ही प्रक्रिया रूढ करावी,” अशी ठाम भूमिका खंडागळे यांनी मांडली आहे.
या प्रकरणातील दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र, संभाजीनगर आणि,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे केली आहे.
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
