मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
भूम प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूम तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव वाहनांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. समाज बांधव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण ११३५ चारचाकी वाहनाने. नागरिक जरांगेना साथ देण्यासाठी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, आता कुठे जायचं मुंबईला जायचं, अशी जोरदार घोषणाबाजी करत आले. यावेळी सकल मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना अनिल शेंडगे म्हणाले की आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत ,अशी ओळीत चालवाव्यात. तसेच तानाजी पाटील म्हणाले की आत्तापर्यंत सुसंस्कृतपणा दाखवत शांततेत ज्या पद्धतीने मोर्चे झाले त्याच पद्धतीने शांततेचे व शिस्तीचे प्रदर्शन करत मुंबईला पोहोचावे व आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मुंबई पोहोचावे. तर ऍड. रामराजे साळुंके म्हणाले की कोर्टाने कुठलाही आदेश काढून मुंबईला येण्यास मज्जाव केलेलानाही त्यामुळे कुठल्याही संकोच न बाळगता सकल मराठा बांधवांनी मुंबईस निघावे. तसेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की यावेळी सहभागी आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांची सर्व सोय ठीक ठिकाणी असेलच पन येणाऱ्यांनी देखील आपआपली तयारी ठेवावी जेणे करून कुठलीही गैर सोय होणार नाही. मनोज जरांगे यांच्या सूचने नुसारच आंदोलनाची रूपरेषा असेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले .
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
