धाराशिव – लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पहिला अर्ज भूम च्या आर्यनराजे शिंदे यांनी घेतला आहे.
राष्ट्रीय समाज दल (आर) या पक्षाच्या वतीने त्यांनी हा अर्ज घेतला असून ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या तासात सहा अर्जांची विक्री झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी संख्या वाढू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त असून गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीसोबत मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
