धाराशिव | दि. 26 ऑगस्ट 2025
धाराशिव शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे आज नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नागरिकांना मुलभूत सुविधा न मिळाल्याने त्रस्त जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही विविध निवेदने, आंदोलने तसेच दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या चर्चेत हे मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :
- शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी दूर करून नियमित व योग्य स्वच्छता व्यवस्था करावी.
- भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
- धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी.
- मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते व नाल्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी.
- शहरात नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण करावे.
- आठवडी व दररोजच्या बाजारातील सोयीसुविधा वाढवाव्यात.
- बंद पडलेले पथदिवे कार्यान्वित करावेत.
- पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करावा.
- कचरा डेपोचे स्थलांतर करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
- भोगावती नदी स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी ठोस नियोजन करावे.
- रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवून आरोग्य धोक्यांपासून नागरिकांना वाचवावे.
- वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.
- जुन्या तात्पुरत्या मंजूर रेखांकनांना अंतिम मंजुरी द्यावी.
आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद नादेरुल्लाह, विजय मुद्दे, उस्मान कुरेशी, मिलिंद बनसोडे, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, मन्सूर कुरेशी, एक्बाल कुरेशी, यासेर काजी, सरफराज काजी, धवलसिंह लावंड, सागर गायकवाड, अलीम एल.डी., हरिदास शिंदे, कपिल सय्यद, सय्यद काजी, शेख मुद्दिक, महादेव पेठे, संतोष पाटील, अब्दुल लतीफ, शहानवाज सय्यद, प्रशांत पाटील, संजय गजधने, आनंद बनसोडे, सय्यद मन्सूर, जयसिंग पवार, शिंदे विश्वासराव, उमेश राजेनिंबाळकर, अजहर पठाण, शेख हज्जू, शेख नूर, ऋषिकेश बनसोडे, अभिषेक बनसोडे, नंदकुमार पडवळ, राजेंद्र कुराडे, ॲड. राजुदास आडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने इशारा दिला आहे की, जर वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील