धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

0
692

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु येथील सिद्धार्थ भालचंद्र कठारे (वय अंदाजे २७) यांचा धाराशिव शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर, सिद्धाई मंगल कार्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून, सतत वाहतुकीचा मोठा दबाव असतो.

सिद्धार्थ हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) धाराशिव तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे यांचे पुत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजता दुचाकी (क्र. एमएच २५ ईएक्स ६७६९) वरून जात असताना ट्रक चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातग्रस्त ठिकाणी अनेक दिवसांपासून सर्व्हिस रोडचे अर्धवट काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढउतार व खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालक हे टाळण्याच्या प्रयत्नात वाहनांवरील नियंत्रण गमावतात, तर सतत वाहने एकाच दिशेने वळवल्याने खड्ड्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here