धाराशिव, दि. 23 ऑगस्ट –
धान्याचे गोडाऊन फोडून हरभऱ्याचे कट्टे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांचे पथक पेट्रोलिंगदरम्यान कार्यरत होते. यावेळी संशयित आरोपी गौस वहीद पठाण (वय 50, रा. एकता नगर, धाराशिव) याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारासह ‘विनायक ॲग्रो’ गोडाऊन (मौजे किनी, जि. धाराशिव) येथून हरभऱ्याचे 43 कट्टे (एकूण वजन 2,559 किलो) चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात उघडकीस आले की, आरोपींनी चोरलेला मुद्देमाल धाराशिव अडत लाईन येथे विकला होता. पोलिसांनी कारवाई करून चोरीस गेलेला हरभरा व गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण 6.29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान आरोपींनी इतर साथीदारांची नावे देखील सांगितली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.
- धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा केवळ 3 टक्क्यांनी पुढे
- परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!
- ईटचा ‘रणसंग्राम’ शांत; उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘पेटी’बंद!
- तेर मध्ये आम आदमी फोडतोय प्रस्थापितांना घाम!
- मेघराज पाटील यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
