१,२०० एकर जमिनीवर ३० वर्षांचा भाडेपट्टा; स्थानिकांना किमान १०० जणांना रोजगार बंधनकारक
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे हाती घेण्यात येणाऱ्या १,२०० एकर क्षेत्रफळाच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आज, १२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. इच्छुक कंपन्यांना आजच आपला प्रस्ताव संस्थानकडे प्रत्यक्ष, टपाल किंवा कुरिअरद्वारे पोहोचवावा लागेल. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.
प्रकल्पाचा तपशील
हा प्रकल्प माळुंब्रा व मसला (खु.) गावांमधील श्री जगदंबा देवस्थान, भारतीबुवा मठ, सिंदफळ यांच्या ताब्यातील जमिनीवर उभारला जाणार आहे. यामध्ये –
- सौर, पवन, हायब्रिड किंवा CBG अशा तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जाईल.
- प्रकल्पाच्या संचालनातून किमान १०० स्थानिकांना रोजगार मिळणे अनिवार्य आहे.
- भाडेपट्ट्याचा कालावधी ३० वर्षे असेल, त्यानंतर जमीन व प्रकल्प ट्रस्टकडे हस्तांतरित केला जाईल.
निविदेच्या प्रमुख अटी
- बोली लावणारी कंपनी कंपनी अधिनियम १९५६/२०१३ अंतर्गत नोंदणीकृत असावी.
- हरित ऊर्जा प्रकल्पांचा अनुभव आणि किमान ₹१०० कोटी वार्षिक उलाढाल असणे आवश्यक.
- भाडेपट्टीचे दर प्रति एकर प्रति वर्ष सर्वाधिक कोट करणाऱ्या कंपनीला प्रकल्प देण्यात येईल.
- वार्षिक भाड्यात दरवर्षी ३% वाढ होईल.
- विजेत्या कंपनीने तीन वर्षांच्या भाडेपट्टीएवढी सुरक्षा ठेव जमा करावी.
स्थानिकांसाठी रोजगाराची संधी
संस्थानने स्पष्ट केले आहे की या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार प्राधान्याने दिला जाईल. यामुळे तुळजापूर तालुक्यातील आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील